राजकारण

अतुल लोंढे यांचा आरोप, निवडणूक आयोगाचे ते परिपत्रक म्हणजे मतचोरीचा पुरावाच विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे आयोगाचे परिपत्रक

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरती मान्यता अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के होणार पदभरती

राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, दारूबंदीचे निवेदन मिळाल्यास योग्य ती कार्यवाही करणार भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन

खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलत होते. अजित …

Read More »

भास्कर जाधव संतापून म्हणाले, सरकार तुमचं आहे म्हणून मान-सन्मान काय ठेवणार की नाही विधानसभेत अजित पवार यांनी निवेदन केल्यानंतर भास्कर जाधव संतापले

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे निवेदन वाचून दाखविले. त्या निवेदनावरून शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत केला. भास्कर जाधव यांच्या संतापाला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यावर उत्तर देत म्हणाले की, १८ जून रोजी यासंदर्भात निर्णय झाला आहे. फक्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भिवंडी शहरानजिकची अवैध गोदामे बंद करणार स्वतंत्र झोन तयार करणार आला, नियमित करण्याची संधी

भिवंडी शहर परिसरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून गोदामांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे. याशिवाय अन्य परिसरात जी गोदामे उभारण्यात आली आहेत, ती नियमित करण्यासाठी यापूर्वी संधी देण्यात आली आहे. ज्यांनी ती अद्यापही नियमित केली नसतील त्यांना सर्वेक्षणानंतर आणखी एक संधी देण्यात येईल, तथापि कोणतीही परवानगी न घेता उभारलेली आणि ती नियमित करुन न …

Read More »

आमदार सतेज बंटी पाटील यांचा सवाल, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी? सरकारने काही सूचना केल्या आहेत का ?

प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या निशिकांत दुबेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेच्या विधानावर नरेंद्र मोदींनी माफी मागावी.

हिंदी सक्तीचे दोन शासन आदेश रद्दे केले असले तरी हा वाद अजून संपलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते जाणीवपूर्वक मराठी भाषा व मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान करत आहे. महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्राबाहेर आपटून मारू या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांना हा अधिकार कोणी दिला असा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल,.. भाजपा संपलेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

मराठी माणसांसोबत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करत तुम्ही चांगले केल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. परंतु भाजपाच्या बुडाला आग लागणे साहजिक आहे. भाजपाचे राजकारण तर तोडा, फोडा आणि राज्य करा असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या हाच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार

पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे. या विषवल्लीचा धोका संपूर्ण …

Read More »

शंभूराज देसाई यांचे आश्वासन, पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक पीएमजीपी आणि म्हाडा ले आऊट प्रकरणी विधानसभेत आश्वासन

पीएमजीपी (पंतप्रधान गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य हरीश पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अमीन पटेल, योगेश …

Read More »