राजकारण

एकनाथ शिंदे यांची घोषणा, वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहिर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या …

Read More »

मंगल प्रभात लोढा चित्ररथातून दाखवणार आरएसएचा १०० वर्षांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास गौरवणारा चित्ररथ तयार

गुढी पाडव्यानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष, संविधान निर्मितीला झालेली ७५ वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, सद्‍भावनेची गुढी उभारूया… आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्‍भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या …

Read More »

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाद केलाच पाहिजे असं आहे का… अनेक वर्षे झाली, दोन्ही समाज सोबतच

राज्यात औरगंजेबाच्या कबरीवरील निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोच आता नवा वाद रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वाद पुढे आला आहे. या समाधीवरून कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या बाबत इतिहासात कोणताही पुरावा नसल्याचे सांगत ती समाधी राज्य सरकारने हटवावी अशी मागणी केली. तर ओबीसीचे नेते …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कर्जमाफी मिळणार नाही ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले

जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या …

Read More »

खड्ड्याची तक्रार आता थेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे ऑनलाईन करा खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसित केली आहे. नागरिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय …

Read More »

कॅगच्या अहवालात राज्यातील कचरा २०० टक्क्याने वाढल्याबाबत चिंता चार वर्षात ६३.१२ लाख मेट्रीक टन कचरा

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अर्थात कॅग अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात बांधकाम आणि विध्वंस (सी अँड डी) कचऱ्याचे उत्पादन २०० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. शहरी स्थानिक संस्थांमधील कचरा व्यवस्थापन अहवालानुसार २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्रात १६.५९ लाख मेट्रिक टन सी अँड डी कचरा निर्माण झाला, ज्यापैकी फक्त ०.२७ लाख मेट्रिक टन …

Read More »

राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्र महोत्सवानिमित्त सर्वदूर विभागातील संस्कृती… कोकण, मुंबई, उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व, पश्चिम विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार...

शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… …

Read More »