राजकारण

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढः असुधारीत वेतन कर्मचाऱ्यांनाही लाभ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने महागाई भत्यात केली वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यंत ५० टक्क्यापर्यंत असलेला महागाई भत्ता आता ५३ टक्क्यावर पोहोचला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून देण्यात येणार आहे. तसेच हा भत्ता थकबाकीसह रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दर सहा महिन्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणीस यांची ग्वाही, सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) द्वारे सह्याद्री अतिथीगृह येथे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ३ हजार रुपये वाढविणार

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ८ मार्चला काँग्रेसची सद्भावना यात्रा नारायणगड, भगवानगड येथे सद्भभावनेसाठी साकडे घालून मस्साजोग येथून ८ मार्च रोजी पदयात्रेला सुरुवात

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील …

Read More »

शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका

मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …

Read More »

आकाश फुंडकर यांचे आश्वासन, माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक माथाडी कायदा रद्द होणार या अफवा

माथाडी कायद्यामुळे अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला असून या कायद्यामुळे माथाडी कामगारांचे जीवन सुकर झाले आहे. माथाडी कायदा एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त सांगितले. सह्याद्री अथितीगृह येथील दालनात माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत माथडी कायदा बचाव कृती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल राज्यात डिजीटल सेवांचे प्रमाण वाढले

तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच देशाच्या ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, नीलम गोऱ्हे यांचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, यायलाच पाहिजे नव्हते ठराविक कालवाधीतील पक्षांचा कालावधी पाहता असे वक्तव्य करायला नको होते

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी …

Read More »

डॉ.पंकज भोयर यांचे आश्वासन, सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या चेहरा असणे हा शिक्षणाचा केंद्रबिंदू

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी जवाहर बालभवन अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सोमवारी साजरा झाला. यावेळी …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आदेश, अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा शाळा सुविधा, प्रशिक्षण संस्था आदी उपलब्ध करा

राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे …

Read More »