नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला. मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना …
Read More »भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव” सहा हजार महाविद्यालयांमध्ये राबविणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या …
Read More »महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास प्रशासकिय मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रशासकीय मान्यता
पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे. पुणे शहरातील महात्मा फुले वाडा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, …
Read More »मोहन भागवत भिवंडीत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म म्हणजे काय…. तिरंगा या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र
मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, आपला …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, दडपशाहीला थारा देणार नाही… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना …
Read More »अपात्र ठरणाऱ्या लाडकी बहिणीच्याबाबत सरकारकडून जारी केला हा आदेश लाडकी बहीण लाभार्थीकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही
नुकतेच राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या पात्रतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक लाभार्थी महिलेने तीचे आधार कार्ड बँक खात्याशी संगलग्नित करावे असे सांगितले होते. तर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियमानुसार एकाच योजनेच्या लाभ महिलांना घेता येईल असे जाहिर वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील लाडकी बहिण योजनेतील …
Read More »७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे जिल्हा अग्रेसर…. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रात सुधारणा
आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले …
Read More »राज्यपाल यांची साद, नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांना एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya