काल शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करत नाना पटोले जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर बैठकीला बसणार नसल्याचे सांगत काँग्रेसबाबत जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वादाबाबतची कल्पना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना फोनवरून दिली. …
Read More »अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण
फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच …
Read More »काँग्रेसचे बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश आमदार हिरामण खोसकर प्रचंड मतांनी निवडून येतील - मंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण सहा आमदार आहेत. हिरामण खोसकर आपले सातवे आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री …
Read More »भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्याच मराठी व्यक्तीः केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित व प्रभावी अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या …
Read More »नाना पटोले यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची नाराजी तर नाना पटोले म्हणाले ते मोठे… अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर केला पलटवार
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस …
Read More »उमेदवारीसाठी राज पुरोहित समर्थकांचे प्रदेश भाजपा कार्यालयामोर धरणे आंदोलन भाजपाचे प्रदेश पदाधिकारी गेले कार्यालय सोडून
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्ये आणि नेत्यांची उमेदवारीसाठी धावपळ सुरु झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राज के पुरोहित यांनी संपूर्ण राजस्थानी समाजालाच नव्हे तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन …
Read More »रिपाईचा डेमोक्रेटीक टीएम कांबळे ग्रुप लढणार विधानसभेच्या १० जागा आरपीआय डेमोक्रेटीकचे कनिष्क कांबळे यांची माहिती
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भासह मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी जाहिर केले आहे. पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?
पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …
Read More »
Marathi e-Batmya