जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू” अशी घोषणा राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पुढे म्हणाले की, ” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण …
Read More »राहुल गांधी यांचा मराठवाडा दौराः परभणी आणि बीडमधील मस्साजोगला भेट देणार सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर …
Read More »महायुतीतील मंत्र्याची खाती जाहिरः जाणून घ्या कोणाकडे कोणतं खातं अधिवेशन संपल्यानंतर खाते वाटप जाहिर
अनेक बैठका आणि जोरदार वाटाघाटीनंतर महायुतीने शनिवारी संध्याकाळी आपल्या मंत्र्यांसाठी कॅबिनेट विभागांची घोषणा केली. गृहमंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्कसह वित्त आणि नियोजन खाते …
Read More »आठवडाभराच्या अधिवेशनात एकूण १९ पैकी १७ विधेयके महायुतीकडून मंजूर विधेयके मंजूर करण्यात महायुतीचा रेकॉर्ड ब्रेक
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा वरवा ज्या पद्धतीने सुरु करण्यात आला होता. अगदी त्याच धर्तीवर आठवडा भराच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने आणि अल्पसंख्य असलेल्या विरोधकाच्या जोरावर १९ पैकी १७ विधेयके मंजूर करून दाखवित एक नवा रेकॉर्ड ब्रेकच केला असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत घर मिळवून देणार कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना
विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल साधणार पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकरांची सखोल चौकशी
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, प्राण जाए पर….उक्ती प्रमाणे आश्वासने पूर्ण करा तेव्हा ३ लाखाचं कर्ज होतं आता ९ लाख कोटीपर्यंतचं कर्ज
भारतीय जनता पक्षाच्या २०१४ सालच्या जाहीरनाम्यात ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे वाक्य होतं. परंतु महाराष्ट्रावर तेव्हा ३ लाख कोटी रूपयांचं कर्ज होतं आणि आता आपण ९ लाख कोटींपर्यंत पोचलो आहे, याबद्दल जयंतरावांनी खेद व्यक्त केला. एमआयडीसीची ताकद वाढवली जाईल, असं आश्वासन देखील त्यात दिलं गेलं होतं. पण राज्यातल्या कंपन्या बाहेर …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटचे बॅट्समन म्हणून जयंत पाटील आले तरी… जाहीरनामा पाहायचा तर तर तो तुमचा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेसनाचा आजचा शेवटचा दिवस. त्यात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कोण काय बोलणार आणि सत्ताधारी त्यावर उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान जयंत पाटील यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानत जाहीरनामा पहायचा तर तुमचा पाहायचा असेही …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, युती सरकार शेतकरी, कामगार व गरीबांचे नाही तर श्रीमंतांचे सरकार सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भ व मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा नाही
विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,… महायुती सरकार अहोरात्र काम करेल विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर
महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीने वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya