राजकारण

विभाजनानंतर नव्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या १,०२१ मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, MPSC च्या परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन केल्याचा बदला…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »

MSEB मध्ये भरती व्हायचाय, मग या अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र आहे का?

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या “विद्युत सहाय्यक” या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हता मध्ये करण्यात आला आहे. या …

Read More »

काँग्रेसची मागणी,… तो जुलमी मोटार वाहन कायदा रद्द करा

केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा …

Read More »

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः बदल्या ३१ जानेवारीपर्यंतच करा

पाच राज्यातील निवडणूकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपाने घवघवीत यश मिळविल्यानंतर आता लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या अनुषंगाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्रात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील अंसंतोषाचा फटका लोकसभेसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत बसायला नको म्हणून राज्यात मध्यावधी निवडणूका घेण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आणि …

Read More »

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत

राज्य शासनाच्या १९ जून २०२३ रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ मार्च २०२४ हे ८ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के …

Read More »

उद्धव ठाकरे यांची सूचना ,… याचा राजकिय इव्हेंट होऊ नये इतकेच

लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेले असतानाच भाजपाच्या रणनीतीनुसार आणि जाहिरनाम्यातील आश्वासनानुसार राम मंदिर उभारणीच्या कामाला युध्द पातळीवर सुरु आहे. त्यातच तसेच मुख्य राम मंदिराचे उद्धाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकिय …

Read More »

अयोध्येत विमानतळ, रेल्वेचे उद्धाटन करत पंतप्रधान मोदींकडून १५ हजार कोटींच्या…

देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील असलेल्या कथित राम जन्मभूमी परिसरात राम मंदीर उभारण्यात येणार आलेले आहे. तसेच त्याचे उद्घाटन २०२४ च्या पहिल्याच महिन्यात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी पर्यटक आणि भाविकांसाठी प्रवासाच्या दृष्टीकोनातून विमानतळ आणि नव्या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यात …

Read More »

आसाममधील उल्फा संघटना, केंद्र-राज्य सरकार यांच्यात शांतता करार

गेल्या अनेक महिन्यापासून ईशान्य भारतातील आसाम विरूध्द नागालँड राज्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच मणिपूर राज्यात दोन वांशिक समाजात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे साऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे ईशान्य भारत मुळ भारतापासून वेगळा होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर अखेर आसाम राज्यातील दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत …

Read More »