राजकारण

नाना पटोले यांचा आरोप, … कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प

राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे देताना हात आखडता घेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प असून भरीव मदत जाहीर केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळवून …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळी पाऊस व गारपिटी नुकसानाची पंचनामे…

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा पलटवारः माझं नाव घ्यायचा काय संबध, अजित पवार इतके…

कर्जत येथील मंथन शिबीरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजीनामा मागे घेण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठाण येथे आंदोलन करण्यासाठी राजीनामा दिलेल्या दिवशी सिल्वर ओक निवासस्थानी आनंद परांजपे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना घरी बोलावून आंदोलन करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवार …

Read More »

अजित पवार यांनी भर शिबीरात, कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांना लगावला मिश्किल टोला

कर्जत या थंड हवेच्या ठिकाणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंथन शिबीराचा आज शेवटचा दिवस असल्याने समारोपाचे भाषण गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे करत असताना त्यांच्या भाषणा दरम्यान, एका कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणाबाजीवरून आणि मुंबईतील पक्ष कार्यालयात बसून राहणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्याना आणि मंत्री …

Read More »

अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…

२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते सत्तेत होते. त्यानंतर मात्र त्यांना भाजपासोबत जायचं असल्याची आठवण झाली. त्यानंतर जो काही शपथविधी झाला, तसेच माघारी बोलावणं झालं. बर त्यानंतर पुन्हा भाजपासोबत जायच असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं. त्या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सर्वजण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,… सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन …

Read More »

प्रफुल पटेल यांचा इशारा, भविष्यात पुस्तक लिहिणार…त्यात खूप काही मटेरियल मिळेल

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबीरात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या सत्रात …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, ही राजकारण करण्याची वेळ नाही…

वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र…

अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वैचारिक मंथन शिबीरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली. शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. पुढे बोलताना सुनिल …

Read More »