राजकारण

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दोलायमान, शासनाचे कर्ज रोखे विक्रीस दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३३ च्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा सवाल, महाराष्ट्रातील मोठे नेते, पण शेतकऱ्यांसाठी काय केले अजित पवार यांच्या उपस्थितीतच मोदींचा शरद पवार यांच्याबाबत सवाल

राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुमारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा

कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांची भेट घ्यावी दिड वर्षे काय करत होतात

मराठा आरक्षणावर आता खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो प्रश्न कसा सुटेल त्यादिशेने विचार करण्याची गरज आङे. कोणालाही काही विचारलेय आणि कोणी काहीही बोलतेय असा त्याचा विचका करू नये नेमकेपणाने काम करून मराठा समाजाला न्याय दिला गेलाच पाहिजे. ती आमचीही मागणी आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हिरे उद्योगासह उर्वरित उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?

महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन …

Read More »

अखेर फडणवीस आणि चव्हाण यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांचा संन्यास मागे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी राजकारण सोडल्याची होती चर्चा

माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर एकच चर्चा रंगली.मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती.त्यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. निलेश राणे यांच्या भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद …

Read More »

शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी महाराष्ट्रातील या प्रकल्पांचे होणार उद्घाटन ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, आरक्षणाचे गाजर दाखवित मराठा, ओबीसी, धनगरांना फसवले एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?

भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या …

Read More »