राजकारण

१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण…

कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय आयोगाच्या निष्कर्शानुसार रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या …

Read More »

कपिल पाटील यांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयात…

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय दि. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला. परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत निर्णय झालेला नाही, याकडे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पत्र देण्यात आले …

Read More »

वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे दिला मुख्यमंत्र्यांना इशारा, …अशी पळवाट सरकारने

वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व …

Read More »

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कार्यालयांवर ईडीची छापेमारी

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पुरोगामी विचारांच्या राजकिय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कृषीविषयक कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून ईडीने ही …

Read More »

“शासन आपल्या दारी” म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना “शेतकरीपुत्राचे रक्तपत्र”

आमचा शेतकरी बाप रात्रं-दिवस शेतात राबतो. दिवसा वीज नसल्याने रात्री साप, विंचूंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो. इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कापूस, सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले. आर्थिक अडचण वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरूई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची. …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, देशात सध्या गाय, गोमुत्र, गोळवळकर हेच दिसतय…

मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपाच्या वतीने सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय

लोकसभेच्या नियोजित निवडणूकीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका होण्याची लक्षात घेत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, नांदेड-बिदर रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर, रेशिम उद्योग आणि वाईन उद्योगांना, पॉवरलूमसह सहकारी संस्थेच्या कायद्यातील काही तरतूदींच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा फायदा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम …

Read More »