राज्यातील मराठा समाजातील पोरांना आरक्षण मिळावे यासाठी उद्यापासून गावागावातील मराठा समाजाने सामुहिक आमरण उपोषणाला सुरुवात करावी असे आवाहन मराठा आरक्षण कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी करत या आमरण उपोषणा दरम्यान कोणाच्या जीवाला काही झाले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे असा इशारा राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला. जालना जिल्ह्यातील आंतरावली …
Read More »कुणबी प्रमाणपत्र समितीला दिली पुढील महिन्यापर्यंत मुदतवाढ समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
तेलंगणा राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असल्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निजामकालीन नोंदी मिळण्यासाठी समिती तेलंगणाच्या संपर्कात आहे मात्र देशातील काही राज्यात निवडणूक लागलेल्या आहेत यात तेलंगणा राज्याचाही समावेश असल्याने निजामकालीन नोंदी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नेत्यांना गावात न येण्याचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी चाललेल्या आंदोलनाची माहिती का दिली नाही असा सवाल उपस्थित करीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचे विशेष विधिमंडळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज …
Read More »उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले
शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …
Read More »सुजात आंबेडकर यांचा इशारा, अधिवेशनावर सुशिक्षित बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार कंत्राटी नोकर भरतीवरून सुजात आंबेडकर आक्रमक
नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.तसेच शाळा खाजगकरणाच्या निर्णय घेतला गेला असून पेपरफुटी …
Read More »आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …
Read More »हसन मुश्रीफ यांना मराठा बांधवांनी भरस्त्यात अडवलं; करावा लागला रोषाचा सामना हसन मुश्रीफ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवत केली राजीनाम्याची मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार काढले तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या अहवानानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच राज्यातील राजकीय नेत्यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आज अनेक गावांमध्ये नेत्यांना मराठा बांधवांना प्रवेशबंदी केली आहे. …
Read More »मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याच सांगितलं कारण ? जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही मंगेश साबळेंनी सांगितलं
मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची गाडी मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळची पहाटे फोडली. यावेळी गाडी फोडणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका
एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …
Read More »
Marathi e-Batmya