राजकारण

निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाने शेण खाल्ल, मग इतका खटाटोप कशासाठी? मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून जाहिरच करावं

एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका …

Read More »

आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीचा आणि राज्यघटनेचा हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय...

आज दिवसभरात उध्दव ठाकरे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने पहिला धक्का दिल्यानंतर संध्याकाळी केंद्रिय निवडणूक आयोगाने दुसरा धक्का देत शिवसेना हे पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आनंद …

Read More »

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार …

Read More »

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.. शिंदे गटाच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच केले भाष्य

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला २५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यावेळी या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतेच असल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झाली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी कानावर हात ठेवत शिंदेंच्या बंडखोरीशी कोणताही संबध नसल्याचा सांगत हात झटकण्याचा प्रयत्न …

Read More »

नाना पटोलेंची टीका, ‘खोके’ सरकारकडे उधळपट्टीसाठी पैसे पण एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी नाही… मविआ सरकारवेळी एस. टी. विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?

शिंदे-फडणवीस सरकार एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी भिमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरू, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली

महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः ठाकरे-शिंदे गटाच्या याचिकेतील इतर विषयांवर २१ तारखेपासून सुनावणी ठाकरे गटाच्या मागणीनुसार अद्याप न्यायालयाचा निर्णय नाही

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. मात्र यातील पहिल्या १६ आमदारांच्या अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया खटल्याचा मुद्दा पुढे आला. तसेच या खटल्याच्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी विद्यमान याचिका ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी सात सदस्यांच्या घटनापीठाने सुनावणी घ्यावी मागणी ठाकरे गटाने ५ सदस्यीय घटनापीठाकडे केली. …

Read More »

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून वेतनासाठी पैसे महाविकास आघाडीच्या काळातील भाजपाचे नेते मात्र गायब

मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगारीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यानंतर परभणीतील एका एसटी कर्मचाऱ्यांने पगार न मिळाल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक तंगीमुळे अखेर काल आत्महत्या केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अखेर २५० कोटी रूपये एसटी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः निर्णय कोणाच्या बाजूने? शिंदे गटाच्या की ठाकरे गटाच्या युक्तीवादानुसार सकाळी १०.३० वाजल्यापासून सुनावणी सुरू

मागील तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीला नबाम रेबिया खटल्याचा निकाल लागू होणार की ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार परिशिष्ट १० तील तरतूदीनुसार हे ४० आमदार अपात्र ठरणार याविषयी युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही गटाकडून पूर्ण करण्यात आला. या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निकाल राखून …

Read More »

फडणवीसांच्या भेटीनंतर खा गिरीश बापट प्रकृती अस्वस्थ असतानाही उतरले प्रचाराच्या मैदानात टिळकांच्या गायकवाड वाड्यात घेतला कार्यकर्ता मेळावा

भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपाने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच अखेरच्या क्षणी भाजपाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीनेही या जागेसाठी उमेदवार …

Read More »