राजकारण

आशिष शेलार यांचे मत, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …

Read More »

एकनाथ शिंदे यांची टीका, कंबरडे मोडल्यावर हंबरडे फोडण्यात अर्थ नाही “माझ्या नादाला लागू नका, मी काम करणारा माणूस आहे” एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा

“नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने …

Read More »

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …

Read More »

रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा …

Read More »

‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मंत्री अशोक वुईके यांची माहिती

आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्या

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.‌ विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीवासी रहिवाशांचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण करणार समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर

समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न …

Read More »

उच्च न्यायालयासाठी २ हजार २२८ पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उच्च न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने २ …

Read More »

द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता स्वतंत्र योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नऊ …

Read More »