राजकारण

राज्यात गुड गर्व्हनन्ससाठी मुख्यमंत्री शिंदेकडून माजी सचिवांची टीम सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी प्रशासनाचे व्हावे सुशासन...!

राज्यातील गुड गर्व्हनन्स अर्थात सुशासन आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिवांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम गुड गर्व्हनन्स निर्माण करण्यासाठी नव्याने नियमावली तयार करेल. त्यासाठी या समितीत राज्याच्या सहा माजी मुख्य सचिवांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात …

Read More »

भाजपाचा शिवसेनेला टोला, पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार याची प्रतिक्रिया

सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले. सत्तेतील शिवसेना पक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारने कुटुंबियांना का दिला ? याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव- भाजपा देश के लिए हानिकारक है..

भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. परंतु २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी …

Read More »

दिवाळी नंतर उडणार मनपा निवडणुकांचा बार? गणेशोत्सवातील गणेश दर्शनाचे निमित्त त्यासाठीच

कोरोना काळातील कडक निर्बधामुळे सार्वजानिक सण उत्सव साजरे करण्यात मोठा अडसर होता.परंतू आता सार्वजानिक सण उत्सवाचे योग जळवून लोकांच्या कार्यकत्त्यांच्या भेटीगाठी यातूनच मनपा अर्थात महापालिकांच्या निवडणुकांची तयारी भाजपा, शिंदे गट आणि मनसेने यांनी मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. सध्या सार्वजानिक गणेशोत्सव सुरू आहे …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, द्वेषाच्या राजकारणामुळे वडीलांना गमावले पण… राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून काँग्रेसची भारत जोडो यात्रा

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला भव्य सुरुवात होणार असून, राहुल गांधींनी त्याआधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. श्रीपेरुंबदुर येथेच २१ …

Read More »

राजकिय पक्षांच्या फंडिंगवरून आयकर विभागाची छापेमारी महाराष्ट्रासह देशभरात केली छापेमारी

आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई …

Read More »

आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे मात्र मला यात पडायचे नाही. मात्र मंत्री पदासाठी मी ठाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना भवनातच पक्षप्रमुख म्हणूनच शोभून दिसतात असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लगावला यावेळी शिंदे भाजप सरकारात आपल्याला मंत्री …

Read More »

सरपंच पदासह ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ‘या’ तारखेला होणार मतदान थेट सरपंचपदांसह १,१६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी …

Read More »

भाजपा खा. डॉ अनिल बोंडे यांचा मोठा दावा, मुस्लिम तरुणाचा हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह विवाह बोगस असल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा दावा करत हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, असा दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती …

Read More »

मुद्दा होता तरूणीच्या अपहरणाचा पण नवनीत राणा यांनी विषय लावून धरला रेकॉर्डींगचा पोलिस स्थानकातच फोन कॉल रेकॉर्डिंग का केला म्हणून पोलिसांना विचारला जाब

उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही हिंदू-मुस्लिम वाद आणि लव जिहादचा मुद्दा तापविण्याच्या भाजपाच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एका मुस्लिम मुलाने हिंदू तरूणीचे अपहरण केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे ही घटना अमरावती जिल्ह्यातील असल्याचाही गौप्यस्फोट केला. त्यानंतर याप्रश्नी राजापेठ पोलिस स्थानकात पोलिसांना जाब विचारण्यासाठी भाजपा समर्थक …

Read More »