राजकारण

मराठा आरक्षण नोकर भरतीसह ‘हे’ महत्वाचे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासह अन्य महत्वाचे निर्णय

नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले सर्वांचे आभार…तर माफी मागतो बाकीचे विषय नंतरच्या कॅबिनेटमध्ये

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडाळी माजली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मविआ सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानत जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल किंवा …

Read More »

अखेर राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री आले मंत्रालयात बघ्या कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी

राज्यात साधारणतः अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उध्दव ठाकरे यांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते. त्यावेळी त्यांच्या प्रवेशाच्यावेळी प्रवेश द्वारापासून ते मंत्रालय इमारतीच्या आत मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून उध्दव ठाकरे यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र त्यानंतर आता राज्यातील राजकिय अस्थिर वातावरणात जवळपास मधला काही अपवादात्मक स्थिती वगळता …

Read More »

अस्थिर राजकिय परिस्थितीवर अमोल मिटकरी म्हणाले, अजून बरंच काही… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत व्यक्त केला संशय

राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात राज्य सरकार आणि शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. …

Read More »

अस्थिर राजकिय वातावरणात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुकांत्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, निर्णय संध्याकाळी कागदपत्रे तयार करून सादर करा

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून परतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्य सरकार अल्पमतात आल्याचे सांगत बहुमत सादर करण्याची मागणी केली. या मागणीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तात्काळ दखल महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश …

Read More »

एकनाथ शिंदे बंड; २ रा अंक संपण्याच्या आधीच ३ रा सुरु फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांचे बहुमत सिध्द करण्याचे आदेश

राज्यातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. या बंडात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर त्याविरोधात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने एकप्रकारे स्थगिती मिळविली. मात्र या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंग …

Read More »

चंद्रकांत खैरेचा खोचक टीका, तो खर्च टरबुजाने केला की कुणी केला? राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ७,००० कोटी रुपये खर्च केले

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये देण्यात आले असा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी करत तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिले. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे नेमके कोण? काँग्रेसने घेतले पहिल्यादांच नाव काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतले सूत्रधाराचे नाव

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीच्या मागे नेमके कोण याविषयीच्या चर्चा महाराष्ट्रातील घराघरात रंगल्या आहेत. मात्र या बंडखोरीमागे नेमके कोण याविषयी आतापर्यंत राजकारणात तरी कोणीही कोणत्याही पक्षाचे नाव अथवा भाजपाच्या नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागील व्यक्तीचे नाव घेतले. त्यामुळे राजकिय वर्तुळात …

Read More »