सध्या भावनेला मारक निर्णय होऊ लागले आहेत. त्याला आपण विरोध करायला हवा. सध्याच्या वादानंतर मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून …
Read More »मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व महापालिकांना दिले “हे” आदेश आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा
पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. नियंत्रण कक्ष, अग्निशमन …
Read More »पंकजा मुंडे यांचा इशारा, संकटानों तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकत नाही स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत विरोधकांची काढली आकौत
सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडला. निर्भिड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. माझ्या जीवनात एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय …
Read More »ग्रामीण युवकांना मिळणार कॅपजेमिनी कडून प्रशिक्षण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम …
Read More »राज्यसभा निवडणुकीसाठीची भाजपाने धुडकावली मविआची “ही” ऑफर चर्चे दरम्यान दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही
राज्यसभेची निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेल्या सहाव्या उमेदवाराचा विजय निर्विघ्नपणे व्हावा या उद्देशाने आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला ऑफर दिली. त्यावर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या प्रस्तावावर भाजपाने मविआचा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपाच्यावतीने नवा प्रस्ताव आघाडीसमोर ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले. आमचा पक्ष राष्ट्रीय …
Read More »संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, वेळ संपली नाही तर खऱ्या अर्थाने सुरू झाली आमचा सहावा उमेदवार ही निवडून येणार
राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या ६ जागांकरीता होणाऱ्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एक शेवटची शिष्टाई म्हणून महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सुनिल केदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरीता त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी गेले. मात्र भाजपा आणि महाविकास आघआडीच्या नेत्यांमध्ये सहाव्या …
Read More »आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली “ही” माहिती भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम
राज्यसभा निवडणूकीतील संभावित घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत समझौता करण्याचा प्रयत्न केला. जवळपास महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर या बैठकीतील चर्चेची माहिती देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,भाजपा तीन जागा …
Read More »सोनिया व राहुल गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्यासाठीच ईडीची नोटीस देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान: नाना पटोले
केंद्रातील भाजपाचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भिती दाखविली जात आहे. उदयपुर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे. परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष …
Read More »काँग्रेस पक्ष भाजपा आरएसएससारखा हुकूमशाह नाही प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या …
Read More »मास्कबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला “हा” अल्टीमेटम निर्बंध नको तर शिस्त पाळा, मास्क वापरा
कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. …
Read More »
Marathi e-Batmya