मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईसह संपूर्ण देशभरात मागील १० वर्षात भाजपा सरकारच्या आर्शिवादाने एका अदानीला किती प्रकल्प देण्यात आले याचा नकाशा दाखवत पुढे म्हणाले की, अदानीसाठी आधी मुंबई आणि मग महाराष्ट्र आणि आता देशच विकायला काढला असल्याचे दिसून येत आहे. सगळे प्रकल्प एकट्या अदानीलाच दिले आहेत. या माध्यमातून आपल्या भोवतीचा फास कसा आवळला जात आहे ते समजून घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांच्या नजरेस आणून दिली.
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, २० वर्षानंतर मी पहिल्यादाच युती केली आहे. या युतीमुळे अनेकांना उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे अनेक जण नाराज झाले असतील, काही जण नाराज झाले, काही दुखावले अशा अनेक गोष्टी झाल्या-होत असतात, काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. पण कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. पण ते कितीही नाराज झाले असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो असे सभेच्या सुरुवातीला जाहिर केले.
भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, तिकडे अकोटमध्ये भाजपाने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपाने काँग्रेसशी युती केली. तर ६६ जण बिनविरोध निवडूण आले. म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. आज ६६ नगरसेवक बिनविरोध नगरसेवक निवडून आले, पण हे आकडे पुढे आणखी वाढत जातील. वाईट वाटतं की लोक विकले जात आहेत. तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेटमधील एका व्यक्तीला उमेदवारी दिली. बदलापूरमध्ये बलात्कार प्रकरणातील एका व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक केलं.हि हिम्मत कुठून आली, हा उद्दामपणा, ही मस्ती कुठून आली असा सवालही भाजपाला केला.
सरकार पुरस्कृत उद्योजकाला पुढे करुन महाराष्ट्रद्वेषी लोकांकडून एमएमआर परिसर बळकवायचा डाव आखला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने लढत मराठी माणसांनी ज्या पद्धतीने मिळवली त्याचा राग अजून काही गुजराती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. त्या रागातूनच अदानी समुहाला हाताशी… pic.twitter.com/tf3qWds9KO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 11, 2026
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अख्खा महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे, आपल्यासमोर काढून ठेवलंय याचा आपल्याला अंदाज नाही. लोकसभा निवडणूकीनंतर मला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने मला जी माहिती दिली, त्यानंतर माझी टीम कामाला लागली. ते मी सगळं आज या ठिकाणी दाखवतो. मला असं वाटतं की हे पाहिल्यानंतर जर आपल्याला भिती वाटली तर यापुढे निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या असा इशाराही यावेळी दिला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा… ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार… pic.twitter.com/SRJgzNSRon
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 11, 2026
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले २०२४ च्या निवडणूका झाल्यानंतर मला माहिती समजल्यानंतर धक्काच बसला, हिंदी, इंग्रजी चॅनल्स असं सगळं ब्लॉक करून टाकलं आहे. कोणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. मी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा भारताचा नकाशा दाखवतो, २०१४ साली गौतम अदानी यांचे किती प्रोजेक्ट किती होते याची ही आकडेवारी, म्हणजे मोदी पंतप्रधान होण्या आधी गौतम अदानी कुठे होते आणि त्यानंतर गौतम अदानी कुठे आहेत असा सवाल करत राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या प्रकल्पाची यादीच दाखविली.
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे –– आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा… pic.twitter.com/qqfT2BxzTT
— Raj Thackeray (@RajThackeray) January 11, 2026
यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करताना म्हणाले की, आम्ही आमच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे हे तुम्हाला सांगू शकतील. आम्ही हे शहर उत्तम करू शकतो, पण तुम्ही आमच्याबरोबर असलात तर हे शक्य होईल, इथे मराठी माणसाची किंमत केली जाते, मराठी माणूस विकला जातोय हे त्यांना माहित आहे. विकणारेही मराठीच आहेत.आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. आजची ही निवडणूक ही मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक आहे हे लक्षात ठेवा. मुंबई गेली तर इथल्या पुतळ्यांना काय अर्थ उरतो, ते पुतळे म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहिला, त्यामुळे आम्हाला मुंबई गमवावी लागली. कुठेही दुबार मतदार दिसला तर तिथल्या तिथे फोडून काढा, सतर्क राहा असे आवाहनही यावेळी केले.
Marathi e-Batmya