काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मतचोरीच्या मुद्यावरून लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधील मुद्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान अमित शाह यांना दिले. तर अमित शाह यांनी काँग्रेसवरच मतचोरीचा आरोप केला.
अमित शाह… है हिम्मत ❓ pic.twitter.com/kbNNlJxhnQ
— Congress (@INCIndia) December 10, 2025
लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, विशेष सघन सुधारणा (SIR) बद्दल विरोधी पक्ष चिंतेत आहे. कारण त्यामुळे त्यांना मतदान करणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची नावे वगळली जातील. तथापि, राहुल गांधी यांनी अमित शाह यांना अडवून त्यांच्या आवडत्या “मत चोरी” या कथित विषयावरील चर्चेला आव्हान दिल्याने तणाव वाढला.
राहुल गांधी यांनी आव्हान देत म्हणाले, “मी तुम्हाला माझ्या पत्रकार परिषदांवर चर्चा करण्याचे आव्हान देतो,” असे आव्हान देताच अमित शाह यांनी लगेचच प्रत्युत्तर देत म्हणाले की, “ते (राहुल गांधी) मी काय बोलतो हे ठरवू शकत नाहीत, त्यांना धीर धरायला शिकावे लागेल. मी माझ्या भाषणाचा क्रम ठरवेन, मी काय बोलायचे ते ठरवेन” असे सांगत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
हिंदुस्तान के इतिहास में पहली बार ऐसा फैसला लिया गया, जिसमें चुनाव आयुक्त को Full Immunity दी गई।
इस Full Immunity देने के पीछे जो सोच थी- हमें उसका जवाब चाहिए।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi pic.twitter.com/ysYPlwokaX
— Congress (@INCIndia) December 10, 2025
या वर्षाच्या सुरुवातीला, गांधींनी तीन पत्रकार परिषदा घेतल्या ज्यामध्ये त्यांनी भाजपाने भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संगनमताने मत चोरी केल्याचा आरोप केला. त्यांच्या तीन पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील कथित मत चोरीची उदाहरणे दिली.
Amit Shah ji, I challenge you to have a debate on the three press conferences.
: LoP Shri @RahulGandhi in Lok Sabha pic.twitter.com/nwMoglaqzb
— Congress (@INCIndia) December 10, 2025
राहुल गांधी यांनी केलेल्या व्यत्ययाचा शाहवर फारसा परिणाम झाला नाही, कारण त्यांनी काँग्रेसवर अधिक तीव्र हल्ला चढवला. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की राहुल गांधी यांचा “हायड्रोजन बॉम्ब” फक्त ‘मत चोरी’ची कथा तयार करण्यासाठी होता. अमित शाह यांनी दावा केला की, काही कुटुंबे पिढीजात “मत चोर” होती, जो नेहरू-गांधी कुटुंबाचा संदर्भ देत टीका केली.
अमित शाह यांच्या भाषणात विरोधकांनी पुन्हा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली तेव्हा अमित शाह म्हणाले, “जब दो बडे बोलते है तब बीच मे नही बोलते (जेव्हा दोन वरिष्ठ बोलत असतात, तेव्हा तुम्ही व्यत्यय आणू नये).”
लोकसभा में चुनाव सुधारों पर आयोजित चर्चा से लाइव…
Speaking in the Lok Sabha on election reforms. https://t.co/YcV3of7Q6M
— Amit Shah (@AmitShah) December 10, 2025
त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस राजवटीत मत चोरीच्या तीन कथित घटनांचा उल्लेख केला. अमित शाह यांनी दावा केला की, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी २८ मते मिळाली होती, परंतु जवाहरलाल नेहरू दोन मतांसह पंतप्रधान बनले.
“ही मतदान चोरी होती… दुसरी मतदान चोरी इंदिरा गांधींनी केली होती, जेव्हा न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्दबातल ठरवल्यानंतर त्यांनी स्वतःला मुक्तता दिली होती,” शाह म्हणाले.
१९७५ मध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक गैरव्यवहारात दोषी ठरवले आणि रायबरेलीमधून त्यांचा विजय अवैध ठरवला. त्यांना ६ वर्षांसाठी सार्वजनिक पद धारण करण्यासही अपात्र ठरवण्यात आले. आणीबाणीच्या काळात पूर्वलक्षी प्रभावाने निवडणूक कायदे दुरुस्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर उच्च न्यायालयाचा निर्णय उलटवला.
काँग्रेसवर टीका सुरू ठेवत अमित शाह पुढे म्हणाले, “भारताचे नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार कशा झाल्या यावरून तिसऱ्या मतदान चोरीचा वाद आताच दिवाणी न्यायालयात पोहोचला आहे.”
मंगळवारी, दिल्लीच्या एका न्यायालयाने १९८०-८१ मध्ये भारतीय नागरिक होण्यापूर्वी मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याच्या पद्धतीतील अनियमिततेबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. तथापि, काँग्रेसने असा युक्तिवाद केला की मतदार यादीत नाव असूनही सोनियांनी कधीही मतदान केले नाही.
Marathi e-Batmya