तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन बुधवारी (२७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रे’मध्ये सामील झाले आणि म्हणाले की भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला ‘कठपुतली’ बनवले आहे.
निवडणूक आयोगाच्या कृतीचा निषेध करताना, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी असे ठामपणे सांगितले की, त्यांनी २००० किमीचा पल्ला पार करून बिहारला भेट दिली, फक्त सर्व लोकांचा सहभाग पाहण्यासाठी.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी असे म्हटले की, जर निवडणूक निष्पक्ष आणि योग्यरित्या पार पडली तर भाजप युतीचा पराभव होईल, म्हणून जनतेला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी कट रचला जात आहे. त्यांनी असा आरोपही केला की भाजपाने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) कठपुतळी बनवले आहे आणि ६५ लाख बिहारींना मतदार यादीतून काढून टाकणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. गेल्या महिन्यापासून संपूर्ण भारत फक्त बिहारकडे पाहत आहे. हीच बिहारच्या लोकांची ताकद आहे! राहुल गांधी यांची ताकद! तेजस्वी यादव यांची ताकद!” गायघाट येथील रॅलीला संबोधित करताना सांगितले.
मुख्यमंत्री स्टॅलिन पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा जेव्हा भारतातील लोकशाही धोक्यात येते तेव्हा बिहारने नेहमीच लढाईचा नारा दिला आहे. हा इतिहास आहे! लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी लोकशाहीचा आवाज, समाजवादाचा आवाज प्रतिध्वनीत केला. त्यासाठी त्यांनी लोकांची ताकद एकत्र केली.”
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाकीत केले की, भाजपाचे विश्वासघातकी राजकारण पराभूत होणार आहे आणि निवडणुकीपूर्वीच विजय निश्चित झाला आहे आणि म्हणूनच भाजपा विजय रोखण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला चावी दिली की नाचणारे बाहुले बनवले आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, ६५ लाख बिहारींचे नाव मतदार यादीतून काढून टाकणे म्हणजे लोकशाहीचा नरसंहार आहे. त्यांच्याच देशात जन्मलेल्या आणि राहणाऱ्या लोकांना यादीतून काढून टाकणे – यापेक्षा मोठा दहशतवाद काय असू शकतो? त्यांच्याकडे सर्व ओळखपत्रे असतानाही, त्यांना पत्ता नसलेल्या लोकांसारखे बनवणे – हा विनाश नाही का? असा सवाल करत माझे भाऊ राहुल आणि तेजस्वी यांचा विजय रोखू शकत असल्यामुळे, भाजपा मागच्या दाराने हे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
त्यांनी राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे कौतुक करताना म्हटले की जेव्हा कोणी बिहार म्हणतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात लालूप्रसाद यादव येतात.
मुख्यमंत्री स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, ते सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहेत! आमचे नेते, कलैग्नार आणि तिरु. लालू हे खूप जवळचे मित्र होते. भाजपला न घाबरता राजकारण केल्यामुळे इतके खटले आणि धमक्या आल्या तरीही, लालू प्रसाद यादव आज भारतातील महान राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून मोठे उभे आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, तेजस्वी खरोखरच त्या वडिलांचा मुलगा म्हणून अथक परिश्रम करत असल्याचे सांगितले.
Welcome to Bihar and the #VoterAdhikarYatra my brother Thiru @mkstalin
Your presence here strengthens our fight against Vote Chori in Bihar and the entire country. pic.twitter.com/lNQWGz1G1n
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2025
द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) अध्यक्ष स्टॅलिन यांनी पुढे म्हटले की, भाऊ राहुल गांधी आणि धाकटा भाऊ तेजस्वी यादव येथेही तेच काम करत आहेत. त्यांनी लक्ष वेधले की ते जिथे जातात तिथे लोक समुद्रासारखे जमतात. “मी माझ्या भावांचे याविरुद्ध संघर्ष करत असल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी येथे आलो आहे. विशेषतः निवडणूक आयोगाच्या घोटाळ्या आणि हेराफेरी उघड केल्याबद्दल राहुल गांधी यांचेही अभिनंदन करत आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, “राहुल गांधी यांनी भाजपाने निवडणुकीला कसे थट्टेचे रूप दिले आहे हे उघड केल्यामुळे भाजप आता त्यांच्यावर हल्ला का करत आहे. त्या रागातून भाजपा त्यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहे. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणारा भाजपा – जनता त्यांची सत्ता नक्कीच हिरावून घेईल,” अशा इशाराही यावेळी दिला.
LIVE: #VoterAdhikarYatra | Muzaffarpur | Bihar https://t.co/upR4sbMjzo
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2025
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, ४०० जागांचे स्वप्न पाहणाऱ्यांना भारत आघाडीने २४० जागांवर ढकलले.
तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, “बहुमत असल्याचा अभिमान बाळगणारे आता अल्पसंख्याक झाले आहेत. बिहारने पुन्हा एकदा सिद्ध करावे की, लोकांच्या सत्तेसमोर कोणत्याही प्रकारच्या हुकूमशहाने झुकले पाहिजे,” अशी मागणीही केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांची बहीण कनिमोझी करुणानिधी यांचे स्वागत केले.
राहुल गांधी, तेजस्वी यादव, व्हीआयपी प्रमुख मुकेश सहानी आणि सीपीआय-(एमएल) चे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मी खात्रीने सांगतोय – नरेंद्र मोदी ‘मतांची चोरी’ करून निवडणुका जिंकतात.” या मतचोरीत निवडणूक आयोग मोदी आणि अमित शाहना मदत करतो,” असा आरोप गांधी यांनी केला.
त्यांनी पुढे असा आरोप केला की निवडणूक आयोग श्रीमंतांची मते हटवत नाही तर दलित, मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांची मते हटवत आहे.
तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारवर टीका करताना म्हटले की, “एनडीए सरकारमधील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक कामासाठी लाच द्यावी लागते. एसआयआर सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४,००० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली आहे आणि हे सर्व पैसे एनडीए नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत.”
Marathi e-Batmya