NCERT चे संचालकांची स्पष्टोक्ती, अभ्यासक्रमातून दंगली का शिकवाव्यात १० वर्षात चवथ्यांदा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम बदलला

मागील १० वर्षात केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशातील शालेय अभ्यासक्रमातून मुघल साम्राज्यासह अनेक ऐतिहासिक उल्लेख वगळण्यात येत आहेत. तसेच १९ आणि २० व्या शतकातील बाबरीचा विध्वंस, गुजरातमधील दंगल या सारख्या दुःखदायक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येत आहे. इतिहास हटविण्यात येत असून यापार्श्वभूमीवर NCERT चे संचालक दिनेश सकलानी यांच्याशी झालेल्या चर्चेचा गोषवारा द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या हवाल्याने दिला.

यासंदर्भात बोलताना दिनेश सकलानी म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोप फेटाळताना, गुजरात दंगल आणि बाबरी मशीद विध्वंसाचे संदर्भ शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदलण्यात आले कारण दंगलीबद्दल शिकवल्याने “हिंसक आणि उदासीन नागरिक निर्माण होऊ शकतात, असा खुलासा केला.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी-NCERT) संचालक दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले की, पाठ्यपुस्तकांमधील बदल हा वार्षिक पुनरावृत्तीचा भाग आहे आणि त्यावर आरोप-प्रत्यारोपाचा विषय नसावा अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट केली.

पुढे बोलताना दिनेश सकलानी यांनी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडल्याच्या संदर्भाबद्दल बोलताना म्हणाले की, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आपण दंगलींबद्दल का शिकवावे? आम्हाला हिंसक आणि निराश व्यक्ती न होता सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत.

पुढे बोलताना दिनेश सकलानी म्हणाले की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने शिकवले पाहिजे की ते आक्षेपार्ह बनतील, समाजात द्वेष निर्माण करतील किंवा द्वेषाचे बळी बनतील? हा शिक्षणाचा उद्देश आहे का? अशा लहान मुलांना आपण दंगलीबद्दल शिकवले पाहिजे का… ते मोठे झाल्यावर ते शिकू शकतील. पण शालेय पाठ्यपुस्तके त्यांना समजू द्या की काय झाले आणि ते मोठे झाल्यावर ते का झाले, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना दिनेश सकलानी म्हणाले की, आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत आणि हाच आमच्या पाठ्यपुस्तकांचा उद्देश आहे. त्यात सर्वकाही असू शकत नाही. आमच्या शिक्षणाचा उद्देश हिंसक नागरिक… नैराश्यग्रस्त नागरिक घडवणे हा नाही. द्वेष आणि हिंसा हे शिक्षणाचे विषय नाहीत, पाठ्यपुस्तकांमध्ये नसल्याबद्दल १९८४ च्या दंगलीबद्दल असाच राडा केला जात नसल्याचे यावेळी सूचित केले.

पाठ्यपुस्तकांतील ताज्या आवृत्तीत या गोष्टींचा उल्लेख टाळण्यात आला आहेः गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंत भाजपाची ‘रथयात्रा’; कारसेवकांची भूमिका; बाबरी मशीद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर जातीय हिंसाचार; भाजपाशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट; आणि “अयोध्येतील घडामोडींबद्दल खेद” अशी भाजपाची अभिव्यक्ती.

दिनेश सकलानी पुढे बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर, बाबरी मशीद किंवा रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला असेल, तर त्याचा आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करू नये, त्यात काय अडचण आहे? आम्ही नवीन अपडेट्स समाविष्ट केल्या आहेत. जर आम्ही नवीन संसद बांधली असेल तर. जुन्या घडामोडी आणि अलीकडच्या घडामोडींचा समावेश करणे हे आपल्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना दिनेश सकलानी म्हणाले, एखादी गोष्ट अप्रासंगिक झाली असेल तर… ती बदलावी लागेल. ती का बदलू नये. मला येथे भगवेकरण दिसत नाही. आम्ही इतिहास शिकवा जेणेकरून विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती कळेल, त्याला रणांगण बनवण्यासाठी नाही, असेही यावेळी सांगितले.

दिनेश सकलानी पुढे बोलताना म्हणाले की, जर आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत आहोत, तर ते भगवीकरण कसे असू शकते? जर आपण मेहरौलीतील लोखंडी खांबाबद्दल सांगत आहोत आणि भारतीय हे कोणत्याही धातूविज्ञानाच्या शास्त्रज्ञापेक्षा पुढे आहेत असे म्हणत आहोत, तर आपण चुकीचे म्हणत आहोत का? ते भगवेकरण कसे असू शकते? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना दिनेश सकलानी म्हणाले की, पाठ्यपुस्तकांतील बदलांमध्ये काय चूक आहे? पाठ्यपुस्तके अद्ययावत करणे ही जागतिक प्रथा आहे, ते शिक्षणाच्या हिताचे आहे. पाठ्यपुस्तकांची उजळणी करणे हा एक वार्षिक व्यायाम आहे. जे काही बदलले जाते ते विषय आणि अध्यापनशास्त्र तज्ज्ञांकडून ठरवले जाते. मी या प्रक्रियेत हुकूम किंवा हस्तक्षेप करत नाही. … वरून कोणतीही लादलेली नाही. अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचे कोणतेही प्रयत्न नाहीत, सर्व काही तथ्य आणि पुराव्यावर आधारित आहे, असा दावाही यावेळी केला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या अनुषंगाने NCERT शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. हरियाणातील सिंधू खोऱ्यातील राखीगढ़ी येथील पुरातत्व स्त्रोतांकडून मिळवलेल्या प्राचीन डीएनएच्या अलीकडील अभ्यासानुसार, आर्य स्थलांतरास नकार दिला जात आहे. हडप्पा आणि वैदिक लोक सारखेच होते की नाही याबद्दल अधिक संशोधनासाठी आवाहन, अनेक विषय पाठ्यपुस्तकांमधून एकतर वगळण्यात आले आहेत.

हुमायून, शाहजहान, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब या मुघल सम्राटांच्या कामगिरीची माहिती देणारा दोन पानांचा तक्ताही काढून टाकण्यात आला आहे. २०१४ पासून NCERT पाठ्यपुस्तकांची पुनरावृत्ती आणि अद्ययावतीकरणाची ही चौथी फेरी आहे.

About Editor

Check Also

इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ

इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *