महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीचा आज चौथा दिवस होता. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवशी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आजही दुपारी एक वाजेपर्यंत सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेक झाल्यावर नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजी मांडण्यासाठी युक्तिवाद सुरू केला. …
Read More »भाजपा नेत्याच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, देशासमोरचे प्रश्न संपले का? नाव बदल आयोग स्थापनेसंदर्भात दाखल केली होती याचिका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा आहे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयातील वेगळ्याच सुनावणीची चर्चा राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कारण देशपातळीवर घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करून केंद्रात ‘नावबदल आयोगा’ची स्थापना करण्याची मागणी दिल्लीतील एका भाजपा नेत्याने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील …
Read More »एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …
Read More »उपमुख्यमंत्री, मंत्री मुंबईबाहेर मात्र प्रशासनाला अमृतच्या एमडी पदासाठी कोणाचा सतत फोन? अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विजय जोशी यांची नियुक्ती
एखाद्या महत्वाच्या पदाकरीता विशिष्ट व्यक्तीचीच निवड करावी यासाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून शिफारस पत्र जाणे किंवा त्या कार्यालयातून एखाद्याने फोन करून शिफारस करणे आदी गोष्टी मंत्रालय आणि जिल्हास्तरीय प्रशासनात नव्या नाहीत. मात्र ओबीसी आणि बहुजन समाजाच्या शैक्षणिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी विशिष्ट …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे का गेला नाहीत? सरन्यायाधीशांच्या सवालावर ठाकरे गटाच्या वकीलांकडून जोरदार प्रतिवाद
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार असताना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सध्याच्या कायदेशीर लढाईत ही अडचणीचा मुद्दा ठरू शकतो अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. नेमक्याच मुद्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनाक्रम सांगत असतानाच बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर …
Read More »आता खुशाल करा विनाआरक्षित रेल्वे तिकीटावर प्रवास, पण हा नवा नियम माहित आहे का? सणासुदीच्या आणि सुट्टीच्या कालावधीतील फुल्ल आरक्षणावर रेल्वेचा तोडगा
आता जवळपास रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच सणा सुदीच्या काळात आणि सुट्टीच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करायचा असेल तर दोन महिने-तीन महिने आधाची प्रवासाचे नियोजन करत आरक्षित तिकिट मिळावे यासाठी आधीच तिकिटाचे बुकिंगही करावे लागते. मात्र अनेकांची तिकिटे आरक्षित होत नाहीत. त्यामुळे या अडचणीवर भारतीय रेल्वेने एक तोडगा काढला आहे. तसेच एका …
Read More »कपिल सिबल यांचा सवाल, अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्री पदाची शपथ कशी? विधिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालय निर्णय घेऊ शकत का? सिबल म्हणाले होय
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दिल्याने अनेक कायदेशीर वाद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर युक्तीवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टानुसार मुळ पक्षातून बाहेर पडलेल्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता …
Read More »महावितरणचे आवाहन, वाढीव पेन्शन योजनेसाठी निवृत कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करा २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना – १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी …
Read More »अमित शाहंचे येणे, कोश्यारींचे जाणे, आयोगाचा निकाल “आप क्रोनॉलॉजी को समझिए” ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या हातीः मॅटर स्क्रिपटेड?
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे कोणती याबाबतचा अद्याप खुलासा झाला नाही. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणे त्याच्या एक दिवस आधी भगतसिंग कोश्यारी यांचा …
Read More »मोठी बातमीः या एका चुकीमुळे ठाकरेंची शिवसेना- धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाः वाचा निकालपत्र निवडणूक आयोगाने ७८ पानी निकालपत्रात दिली सविस्तर कारणे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला. त्यावर उध्दव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देवू नये अशी मागणी केली. …
Read More »
Marathi e-Batmya