विशेष बातमी

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात …

Read More »

BreakTheChain या २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्केपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी राज्य सरकारकडून जिल्हानिहाय पॉझिटीव्हीटीची माहिती जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांना रूग्णसंख्येच्या आधारावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दराची माहिती जारी केली. या दुसऱ्या आठवड्यात ५ टक्केपेक्षा कमी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणखी ४ जिल्ह्यांची वाढ झाली असून गतवेळी २१ तर या आठवड्यात २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्के …

Read More »

आशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी गटप्रवर्तक कृती समिती आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात आज सकाळी बैठक झाली. परंतु बैठकीत सर्वमान्य तोडगा न निघाल्याने आशा सेविकांचे आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता आहे. आशा सेविकांनी आंदोलन …

Read More »

शिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय? मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी …

Read More »

“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर ! चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी सेवादलाच्या ऐंशीव्या पुनर्घटनादिनी देशाला संबोधताना, भारतरत्न अमर्त्य सेन यांनी स्किझोफ्रेनिया सरकारशी लढताना भारत हा भरपूर प्रतिकार शक्ती असलेला आणि उत्पादनाची कमाल क्षमता असलेला देश असल्याचं म्हटलं आहे. अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी आणि आंबेडकर यांच्या रस्त्यानेच अपार शक्यतांचा, अपार आशा, उमेद आणि संभावनांचा हा देश या …

Read More »

प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …

Read More »

‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले. दरम्यान सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत …

Read More »

आरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा असे एकूण …

Read More »

शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी ‘ब्रेकिंग द चेन’साठी शासनाने ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे. या बंधनांसंदर्भात प्रशासन आणि सामान्यांच्या मनातील शंकांचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात नऊ मुद्दयांचे स्पष्टीकरण …

Read More »

जाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार

मुंबई: प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.या सुचना प्रशासनासाठी आहेत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या प्रमाणे निर्णय घेईल. कुणीही गोंधळू नये व इतरांना …

Read More »