विशेष बातमी

अपात्र झोपडीचा पुरावा द्या आणि घर मिळवा राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे घर नसल्याने रस्त्याच्या कडेला, शासकीय जमिनीवर अथवा खाजगी व्यक्तीच्या जमिनीवर झोपड्या घालून रहात असल्याचे दिसून येते. यातील अनेक झोपडीधारक अपात्र ठरत असल्याने त्यांच्या घराचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा अपात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना हक्काचे मिळणार असून फक्त अपात्र झोपडीचा पुरावा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठे खिंडार माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी देशातील लोकसभा निवडणूकांना एक वर्ष तर विधानसभेच्या निवडणूकांना दिड वर्षे अद्याप राहीलेली असतानाच सर्वच राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आणि नेत्यांची पळवा पळवी सुरु केली आहे. या पळवा पळवीत आता शिवसेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश …

Read More »

सरकारकडून जलयुक्त शिवार योजना राबवूनही मराठवाडा सर्वाधिक तहानलेला १४७० टँकर्सने केला जातो पाणी पुरवठा : तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ५५० टँकरचा वापर

मुंबई : प्रतिनिधी सततच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावसाळी पाण्याची साठवून आणि त्याचा पुर्नवापर करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र मागील तीन वर्षात राज्यातील जवळपास १६ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत असला तरी मराठवाड्यातील …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा शहरातील पायाभूत सुविधा निर्मितीत अडचण येण्याची मुंबई महापालिकेला भीती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील परवडणाऱ्या घरांचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने आणि म्हाडा इमारतींच्या पुर्नविकास प्रकल्पांना गती देण्यासाठी म्हाडा प्राधिकरणास नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई शहरातील पायाभूत सुविधांबरोबरच महसूलावर परिणाम होणार असल्याची मत व्यक्त करत म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास विरोध दर्शविला. तसेच …

Read More »

महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशातील ४८ नद्या व समुद्र किनारे होणार स्वच्छ

नवी दिल्ली : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यातील ४८ नद्या व समुद्र किना-यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मि-या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा समावेश या मोहिमेत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण …

Read More »

मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण

मुबंई : प्रतिनिधी आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि …

Read More »

राज्य सरकारी सेवेतील ३६ हजार रिक्त जागा भरणार ग्रामविकास, सार्वजनिक आणि गृह विभागातील सर्वाधिक जागांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा …

Read More »

वारली चित्रकला पोरकी झाली पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने निधन

मुंबई : प्रतिनिधी बदलत्या काळात कला प्रकार लुप्त होत असताना केवळ आपल्या अतुलनीय कामगिरीच्या माध्यमातून आदीवासी समाजाची वारली चित्रकला फक्त जागतिकस्तरावर नेता सर्वमान्यता मिळवून देणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारली चित्रकला पोरकी झाल्याची भावना चित्रकलावंतामध्ये निर्माण झाली …

Read More »

आदीवासी विद्यार्थी सोयी-सवलतींच्या प्रतिक्षेत पाठ्यपुस्तके, पाणी, वसतिगृहाच्या समस्येतही शिक्षण पूर्ण करण्याची आस

मुंबई : कविता वरे राज्यातील मुख्य प्रवाहातील समाजाबरोबर डोंगर दऱे, जंगलात राहणाऱ्या आदीवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता आश्रमशाळांना केंद्र सरकारने मान्यता दिली. यातील काही शाळा राज्य सरकार तर काही खाजगी संस्था चालकांकडून चालविल्या जात आहेत. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात जगाने पाऊल ठेवूनही पुरेशी पाठ्यपुस्तके, …

Read More »

बीडीडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा म्हाडाकडून फक्त ३ हजार ५०० कोटीचे फायनान्शियल मॉडेल तयार

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे ना.म.जोशी रोड, वरळी, नायगांव येथील खुराड्या वजा घरात रहात असलेल्या बीडीडीतील चाळकरी मुंबईकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळणार आहे. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाला तब्बल ४५ हजार कोटीं रूपयांची गरज लागणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांचे फायनान्शियल मॉडेल म्हाडाने तयार केले …

Read More »