विशेष बातमी

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …

Read More »

आणखी एका वृध्द महिलेचा मंत्रालयाच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न वृध्द महिलेस सेंट जॉर्ज रूग्णालयात केले दाखल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी गतीमान राज्य सरकारच्या धिम्या कारभाराला कंटाळून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या व्यक्तींकडून आत्महत्या करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर साधारणत: ६० ते ६५ वयोगटातील वृध्द महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न …

Read More »

गुन्हा दाखल झालेल्या विझक्राप्ट कंपनीलाच पुन्हा मँग्नेटीक महाराष्ट्रचे काम राज्य सरकारला विसर आपल्याच निर्णयाचा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत गिरगाव चौपटीवर आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनीत आग लागली. त्यामुळे बेशिस्त नियोजन करणाऱ्या विझक्राफ्ट कंपनीला काळ्या यादीत टाकत त्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र या आपणच दाखल केलेल्या गुन्ह्याचा पूर्ण विसर पडत राज्य सरकारने पुन्हा त्याच कंपनीला …

Read More »

राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर बंदी ? आगामी अधिवेशनात कायदा आणण्याच्या हालचाली

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

कैद्याच्या मृत्यूची तक्रार दाखल करण्यावरून दोन पोलिस निरिक्षकांमध्ये भांडण औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील निरिक्षक आमने-सामने

औरंगाबाद : प्रतिनिधी दोन व्यक्तींमधील वाद अथवा भांडणे सोडविण्यासाठी नागरिकांकडून पोलिसांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र तुरूंगातील कैद्याचा मृत्यू रूग्णालयात झाल्याने त्याची नोंद घेण्यावरून औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षकच एकमेकांवर धावून जात भांडणे करत असल्याचा अजब किस्सा नुकताच घडला. सहा महिन्यांपासून हर्सूल कारागृहातील एक कैदी बबन चंदू सोनवणे …

Read More »

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत- पाकिस्तानचे संबंध बिघडतील इस्लामाबादेतील भारतीय दूतावास कार्यालयाचा विचित्र तर्क

मुंबई: प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकिय तणाव असला तरी पाकिस्तानातील रूग्णांना भारतात येवून वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील तर त्यांना उदार अंतकरणाने देशात प्रवेश देण्याचे धोरण केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने स्विकारले. परंतु वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तानातून कोण कोण व्यक्ती भारतात आले याची माहिती इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाला विचारली असता येणाऱ्यांची माहिती दिल्यास भारत-पाक …

Read More »

तीन वर्षापासून रखडलेले क्रिडा पुरस्कार जाहीर क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून यादी प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एकही क्रिडा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीची दखल घेत मागील तिन्ही वर्षाचे पुरस्कार राज्याचे क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी आज बॉम्बे जिमखाना येथे जाहीर केले. पुरस्काराचे नाव  2014-15  2015-16 2016-17 एकूण शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरवपुरस्कार 25 …

Read More »

रिलायन्स सांगे राज्य सरकार डुले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी सरकारचे ४५० कोटी रूपयांवर पाणी

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील अनिल अंबानीच्या रिलायन्स एनर्जी कंपनींच्या  एक हजार ४५२ कोटी रूपयांंच्या थकीत कर वसूली अद्याप न करणाऱ्या राज्य सरकारने रिलायन्सवर आणखी एक मेहरबानी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रिलायन्सच्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठासाठी लागणाऱ्या जमिन खरेदीवरील  तब्बल ४५० कोटी रूपयांच्या महसूलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली आमच्याकडे न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यासाठी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली. मात्र आमच्याचकडे न्यायाधीशांची कमतरता असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती …

Read More »

उच्च न्यायालयाच्या रट्ट्यानंतर शिक्षण खात्याला जाग अखेर मुंबईतील शिक्षकांचे पगार स्टेट बँकेतून देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपमय झालेल्या प्रविण दरेकरांच्या मुंबै सहकारी बँकेला वाचविण्यासाठी मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन मुंबै बँकेतून देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याची अखेर भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली. तसेच या …

Read More »