नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …
Read More »सागर बंगल्याचा आशीर्वादाने नेते दहशत… रोहित पवार यांचा आरोप रोहित आर.आर.पाटील यांचे आंदोलन, तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर अयाज मुल्ला यांच्यावर भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी अयाज मुल्ला यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेत मुल्ला यांची ७६ वर्षीय आईने आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न …
Read More »जयंत पाटील यांची टीका, अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत… 'शाहना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'
शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …
Read More »भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, ती ट्रस्ट माझ्या मालकीची नाही… विरोधकांच्या टीकेनंतर बावककुळे यांचा खुलासा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी रूपयांची जमिन स्वस्त दरात दिल्याप्रकरणी विरोधकांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी ती ट्रस्ट माझअया मालकीची नसल्याचा दावा केला. बावनकुळे अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, सरकार बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शरद पवार यांचा निर्धार, सरकार बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपा सोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री… निवडणूक लढवायची याचा निर्णय ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी घेणार
जेव्हा जनता पक्षाची निर्मिती झाली तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हते. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून निवडून आले. आज, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही त्यांना त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा पर्याय देऊ शकतो. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळाचा कोण भाग आहे हे आपण ठरवू शकतो,’ असे राष्ट्रवादी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, परस्पर उमेदवार जाहिर करायला परवानगी नाही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी टोकले
नुकतेच श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगांदा येथील शिवसेना उबाठाचा उमेदवार म्हणून पाचपुते असतील अशी घोषणा केली. त्यावरून महाविकास आघाडीत खडाखडीला सुरुवात झाली. त्यातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले. त्यानंतर …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुतीकडून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न ओबीसी - मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी
ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचा आरोपही एक्सवर ट्विट करत यावेळी केला. ॲड. प्रकाश …
Read More »जयंत पाटील याची टीका, डॉ. आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट… वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव
आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपाचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने …
Read More »
Marathi e-Batmya