Tag Archives: शिवसेना उबाठा

दीपक केसरकर यांची टीका, कोकणी माणसावर उबाठाचे बेगडी प्रेम कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असल्याचे निवडणुकीतून शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज केली.  बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकताच उबाठा नेतृत्वाने पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचे जाहीर केले. या वक्तव्याचा केसरकर यांनी खरपूस …

Read More »

शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाची मागणी, भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नका शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट, पालिका आयुक्तांनी दाखवला सकारात्मक प्रतिसाद

बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे ९ मजल्यांचे ४९०खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर…. चला मराठी शिकू या हा आमचा उपक्रम

रामनवमी दिन हा दिवस ६ एप्रिल आला. त्यातच रामनवमी हा आणि भाजपाचा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याने भाजपाने त्यांचा वर्धापन दिवस साजरा केला. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावत रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा एवढ्याच माझ्या …

Read More »

संजय राऊत यांची टीका, त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा

राज्यातील एका शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असा सवाल केला असता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जे घेता पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता आणि कर्जमाफीच्या पैशानं करता काय असा सवाल साखरपुडे, लग्न… असा अजब सवाल करत शेतकऱ्यालाच सुनावलं. माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, वक्फ विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट मुस्लिम संघटनांनी जनाब उद्धव ठाकरेंचे आभार मानले

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा खोचक सवाल, युटी UT म्हणजे यूज अँड थ्रो म्हटले तर चालेल का? ‘वक्फ’ला विरोध करुन हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाचा नेतृत्वाचा वैचारिकदृष्ट्या गोंधळ उडाला असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, जीनांनी केलं नसेल इतकं लांगूलचालन काल संसदेत भाजपाकडून सुरु फडणवीस अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर चालणार की नवाज शरिफ यांच्या विचारांवर चालणार

काल २ एप्रिल होती म्हणजे आज ३ एप्रिल असणार हे स्पष्टच आहे. काही गोष्टींवरून लक्ष्य हटविण्यासाठी काल संसदेत वक्फ बिल संसदेत सादर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला शुक्ल कमी करण्यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच जर शुल्क कमी केले नाही तर आम्ही टॅरिफ लावू असा इशारा देत २ एप्रिल पासून …

Read More »

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कल्याण मंडळाची पुनर्रचना

राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार

मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार …

Read More »