Tag Archives: आचार्य देवव्रत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था दादरच्या चैत्यभूमी येथे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल बोलत होते

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा दावा, नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या …

Read More »

गुजरात राज्य मंत्रिमंडळात २१ नव्या-जून्या मंत्र्यांनी घेतली आज शपथ काल २१ मंत्र्यांनी दिला होता राजीनामे आज नव्या-जून्या मंत्र्यांनी शपथ घेतली

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …

Read More »

जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …

Read More »

महाराष्ट्राची जबाबदारी आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदी झाल्याने रिक्त पदी आचार्य देवव्रत यांच्याकडे जबाबदारी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदी झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल रिक्त झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केले. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर २०२५) देशाचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून …

Read More »