Tag Archives: काँग्रेस

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना अनुभव नसलेल्या चड्डा या बिल्डरच्या घशात ४००

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या …

Read More »

आरएसएसवरील बंदी केंद्राने हटविलीः जयराम रमेश म्हणाले, अर्ध्या चड्डीत येऊ शकतात १९६६ साली आरएसएसवर घातलेली बंदी ९ जुलै २०२४ रोजी हटविली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांच्या कृत्य-कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालणारा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने नुकताच उठविला. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक शब्दात टीका करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … नेत्यांचा विकास, पण कोकणी माणसाकडे दुर्लक्ष कोकणात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, जनतेत जा, संघटनेचे काम करा

कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच शिंदे सरकारने ‘लाडका मित्र’ योजनेतून अदानीला मुंबईतील किती कंत्राटे दिली – खासदार वर्षा गायकवाड

मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या धंद्यामागे कोण आहेत त्याच्या मुळाशी जाऊन रॅकेट उद्ध्वस्थ केले पाहिजे. महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पहिल्यात पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट झाली, नालेसफाईच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमदारांच्या किमती ठरवून घोडेबाजार बनवला …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकार अदानीला देण्याचा प्रयत्न मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी …

Read More »

के सी वेणुगोपाल यांचा इशारा, पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही…आमदारांवर कारवाई राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही: नाना पटोले

विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत जिल्हाधिकाऱ्यांची बदली तर जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका करत या दुर्देवी घटनेचा …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात …

Read More »