राहुल गांधी यांची घोषणा, वायनाड भूस्खलन दुर्घेटनेतील कुटुंबियासाठी १०० घरे बांधणार केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित मदत देण्याची गरज

नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत २००हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला. तसेच संपूर्ण परिसरात चिखल आणि माती पसरली. या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने यांनी केरळ येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वायनाड येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी १०० घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, केरळमध्ये यावेळच्या वायनाडमधील दुर्घटनेइतकी विनाशकारी घटना एका भागात कधीच घडली नाही. मी हा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारांसमोर मांडणार आहे, कारण या शोकांतिकेला अनोखे आणि तातडीच्या प्रतिसादाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आमचे तात्काळ लक्ष बचाव, मदत आणि पुनर्वसन या प्रयत्नांवर आहे. काँग्रेस परिवार येथे १०० हून अधिक घरे बांधण्यासाठी कटिबद्ध आहे. या गरजेच्या वेळी आमच्या बंधुभगिनींना शक्य ती सर्व मदत केली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत असेही यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घटनात्मक पदावर बसलेल्या विधान सभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य, महाविकास आघाडीची टीका

राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *