Tag Archives: देवेंद्र फडणवीस

संजय राऊत म्हणाले की, खरातावरील कारवाई कौतुकास्पद, आता चाकणकरांवर कारवाई करा शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी केली मागणी

भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. भोंदु प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आव्हान, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागा महापौर रितु तावडे यांना खासदार वर्षा गायकवाड यांचे आव्हान

मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी राहत असतील, तर तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे. दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, अशावेळी महापौर रितु तावडे यांनी अमित शाह व …

Read More »

जयंत पाटील यांचे मागणी, शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा, मदत देताना अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जयंत पाटील यांची मागणी

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले की, उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस …

Read More »

२१ मार्चला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थितीत

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉल मध्ये होणार आहे. या  कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा,  …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता वाढली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील …

Read More »

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित …

Read More »

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महानगरपालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढणार

राज्यात प्लास्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य शशिकांत शिंदे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, सदाभाऊ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित जल प्रवासी वाहतुकीला गती

“मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतूकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सुरू झाली. बैठकीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार २०२९ पर्यंत वीजदरात स्थिरता येणार

महाराष्ट्र महावितरण कंपनीने  १ लाख कोटी रुपयांचा  वर्षाचा महसूलाचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे आता राज्यातील उद्योगांना, ‘सोलर अवर्स’मध्ये (सकाळी ९ ते ५) वीज वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. महावितरणने केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर वाढण्याऐवजी दरवर्षी …

Read More »