आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी ‘गट-अ’ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. …
Read More »रोहित पवार यांची टीका, फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटीवर का नाही ?
कर्जत जामखेड मतदार संघामधील एमआयडीसीचा मुद्दा मी अधिवेशनात मांडल्यानंतर आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात. उद्योग मंत्री यांच्यावर वरून फोन करून बैठक घेण्यासाठी सांगायला सांगतात केवळ बैठकी घेऊन राजकारण करण्याचं काम सध्याचे सरकार करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार
बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार …
Read More »शरद पवार यांची टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे विधान पोरकटपणाचे
अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचा मुद्दा हरकतीच्या मुद्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावरून विधानसभा सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाह्यला मिळाला. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता …
Read More »प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपात
माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता …
Read More »नाना पटोले यांची मागणी, जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा, आई-बहिण काढता अन् शिवाजी महाराजांचे उदाहरण देता
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न रखडण्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप करत आपला बळी घेण्यासाठी इन्कांऊटर करण्याचा किंवा सलाईनमधून विष देण्याचा डाव असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण रहात असलेला …
Read More »आशिष शेलार यांच्या मागणीवर विधानसभाध्यक्षांचे आदेश, जरांगे पाटीलांची एसआयटी चौकशी करा
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न रखडण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आंदोलक फुटत नसल्याने आपल्यावर विष प्रय़ोग आणि एन्कांऊटर कऱण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही केला. तसेच त्यानंतर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र बेचिराख होई …
Read More »विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ‘फसवणूक नको आरक्षण द्या’
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’ ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे १५ महत्वाचे निर्णय आदिवासीसह शेतकरी आणि शहरीभागातील नागरिकांना खुष करण्याचा प्रयत्न
राज्यातील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशना निमित्त राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी खास राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेस, मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले …
Read More »
Marathi e-Batmya