Tag Archives: भाजपा

परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिकेबाबत उत्तर द्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,सह-मुख्य …

Read More »

राहुल गांधी यांनी भाजपा महिला खासदारांना पाहुन केले फ्लाईंग किस? वाचा नेमकं काय घडलं राहुल गांधी यांच्या भाषणामुळे चिडलेल्या भाजपा महिला खासदारांच दावा

मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. त्यानंतर राहुल गांधी आज ९ ऑगस्ट रोजी लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर अविश्वासदर्शक ठरावावर आपले मत व्यक्त करताना केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला …

Read More »

राहुल गांधी यांचा मोदींसह भाजपावर निशाणा; भारताचे तुकडे करताय, मणिपूरमधील आईला मारलत… अविश्वास ठरावावरून राहुल गांधी यांची मोदी यांना रावणची उपमा

मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे विरोधकांनी याप्रश्नावर चर्चेची मागणी करत सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव संसदेच्या लोकसभेत आणला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या …

Read More »

‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …

Read More »

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, … काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी …

Read More »

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …

Read More »

भाजपाशी सलगीच्या चर्चा? म्हणजे आमचा मोठा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली खंत

जयंत पाटील आणि मी शरद पवारांसोबत आहोत. मी मरेपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. मात्र जयंत पाटील आणि माझ्याविषयी भाजपाशी सलगीच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. तशा चर्चा होणे म्हणजे आमचा मोठा आपमान आहे, असे शरद पवारांच्या विश्वासातले असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री …

Read More »