Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची माहिती, ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे …

Read More »

घराणेशाहीला विरोध करता करता भाजपाच्या पहिल्या यादीत घराणेशाहीच १० कापलेल्या उमेदवारांच्या कुटंबियांनाच तिकीटे

नवीन कुमार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या मोठ्या बार्गेनिंगनंतर उमेदवार निवडत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या ९९ उमेदवारांमध्ये १० नवीन चेहरे आहेत. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, पराभव दिसू लागल्याने मविआचे नेते मतदार यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची टीका

महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची घोषणा, आपल्याला संपविणाऱ्यांना संपवायचाय… अर्ज काढून घ्या म्हणलं की काढू घ्या, राखीव मतदारसंघातील आपल्या विचाराच्या उमेदवाराला मदत

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा राज्य सरकारला विविध मार्गांनी आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने दिलेली मागणी पूर्ण करत नसल्याचे दिसताच निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार आज सकाळपासून अनेक राजकिय जाणकार, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण

फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …

Read More »

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्याच मराठी व्यक्तीः केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित व प्रभावी अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या …

Read More »

उमेदवारीसाठी राज पुरोहित समर्थकांचे प्रदेश भाजपा कार्यालयामोर धरणे आंदोलन भाजपाचे प्रदेश पदाधिकारी गेले कार्यालय सोडून

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्ये आणि नेत्यांची उमेदवारीसाठी धावपळ सुरु झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राज के पुरोहित यांनी संपूर्ण राजस्थानी समाजालाच नव्हे तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन …

Read More »

भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप

नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …

Read More »