परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणी …
Read More »अवाढव्य वीज दरावरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल, वीज महाग का? सरकारकडे प्रचंड बहुमत, अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी
राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या विज महाग मिळत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती
‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …
Read More »नाना पटोले यांची टीका, मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय बॅलेट पेपरवर मतदान ही मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »विधानसभा विशेष अधिवेशन उद्यापासून, हंगामी अध्यक्ष पदी कालीदास कोळंबकर विधानसभेचे तीन दिवस अधिवेशन मुंबईत
राज्यात नव्याने सत्तेवर स्थानापन्न झालेल्या संशयातीत बहुमाताचा आकडा गाठणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. सांसदिय प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्याद्वारे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आदी गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधानसभेचे खास अधिवेशन …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, गुजरातधार्जिण्या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, …
Read More »रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करु नका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र
वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील …
Read More »नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?
भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …
Read More »संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्याः उच्च न्यायालयाचे आदेश निष्कर्ष कशाच्या आधारे ? तपासाचा तपशील सादर करा
महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे दिग्रसचे आमदार संजय राठोड हे मागील काही वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांच्याकडे कार्यकर्ती म्हणून रूजू झालेली एक मुलगी गर्भवती राहिली. तसेच त्या तरूण मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात राज्यात एकच गदारोळ उडाला. त्याचबरोबर संजय राठोड आणि त्या मुलीचे कथित प्रेमसंबध …
Read More »जयंत पाटील यांची खंत, एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर… राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकरी संकटात ; कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान
राज्यभरात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता त्यात एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी आपल्या …
Read More »
Marathi e-Batmya