Tag Archives: शेतकरी

फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी ४० हजाराचे अनुदान

अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, मंत्री मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मंत्री मुंडे यांच्या या तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या खात्याचे कौतुक

पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप …

Read More »

३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक …

Read More »

शेतकरी बांधवांची दिवाळी गोड, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ.. केंद्राच्या या योजनेचा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ

शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा १५ वा हप्ता लवकरच मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकऱ्यांसाठी योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत ? कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करा

राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात किती यशस्वी ठरल्या याचे मूल्यमापन सरकारने करावे. कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर याबाबतची जबाबदारी निश्चित करावी. त्याचबरोबर बळीराजाच्या हितासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून रॉयल्टी, अनामत रक्कम घेऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. विजय …

Read More »

झेंडूच्या फुलांनी दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

झेंडूच्या उत्पादनाने दसरा, दिवाळी सुखात जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या कवडीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर, कदाचित नीट ब्रीफींग झाले नसावे मोदी सरकारने साखरेची निर्यात बंद केली, आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून निर्यात बंद

दोनच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फार केले अशा पध्दतीने वावरतात. मात्र ते देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी फार काही करू शकले नाहीत असा आरोप शरद पवार यांचे नाव घेता शिर्डी येथील जाहिर कार्यक्रमात केला. त्यावर काल रायगड येथे झालेल्या एका बँकेच्या कार्यक्रमात …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »