परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. या दौऱ्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केलेली असताना, आता राज्याचे कृषीमंत्री तथा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही निशाणा साधला. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी …
Read More »केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालय दालनात मंत्री सत्तार यांनी केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या विविध कृषी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, नानाजी …
Read More »कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची “त्या” घटनेबाबत केला खुलासा मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ प्रकरण
काल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली असल्याचे चर्चा सुरू असताना त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत …
Read More »‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी सामंजस्य करार
मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. ‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल, …
Read More »नाना पटोले म्हणाले, कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू …
Read More »शिंदे गटातील मंत्र्यांवर मुख्यमंत्री शिंदेंची माणसे ठेवणार लक्ष्य भाजपाच्या पध्दतीने शिंदेंचे पाऊल
राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर आधीच्या तुलनेच चांगली खाती मिळाली नसल्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बाहेर आल्यानंतर या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील माणसे त्यांच्या दिमतीला देत आपल्याच मंत्र्यांवर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी नाराज मंत्र्यांना केले खुष; स्वत:कडील खात्यांची जबाबदारी “या” मंत्र्यांकडे संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर यांच्यासह आठ जणांकडे सोपविली जबाबदारी
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहिर केले. परंतु शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे वाटप रूचलेले नसल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये सुरु झाली. त्यातच बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त असलेल्या खात्यांचा कारभार नाराज …
Read More »वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन
शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड …
Read More »अब्दुल सत्तार म्हणाले, नरहरी झिरवळांना हटविणार निकालासाठी थांबलो होतो पण आता नाही थांबणार
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. परंतु या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होवून एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यापार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालासाठी आम्ही थांबलो होतो. मात्र आता …
Read More »जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही, प्रत्येक तालुक्यात प्रशासकिय इमारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
अहमदनगर: प्रतिनिधी कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले. कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी,आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत …
Read More »
Marathi e-Batmya