Tag Archives: ajit pawar

अजित पवारांनी केली मोठी घोषणा : पुण्यात लेव्हल ३ चे निर्बंध आणखी शिथिल आढावा बैठकीनंतर केली दिली माहिती

पुणे : प्रतिनिधी पुणेसह ११ जिल्ह्यात लेव्हल ३ चे निर्बंध लागू केल्याने नाराज झालेल्या व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात करत दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर आज अखेर पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेव्हल ३ चे निर्बंध शिथिल करत पुणे शहरातील …

Read More »

राज्याच्या जीएसटी विभागाचा अजब कारभार: २०० कोटींचा चुना लावणाऱ्यांची बदली आधीची कामगिरी, सीआर न तपासताच बदलीसाठी शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत असून महसूली उत्पन्नाची वाणवा भेडसावत आहे. त्यातच राज्याच्या जीएसटी विभागातील एकाने चक्क तीन वर्षात २०० कोटी रूपयांचा सरकारलाच चुना लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाची बक्षिसी म्हणून चक्क जीएसटी विभागाने या संबधित इन्फोर्समेंट ऑफिसर अर्थात …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय कृषी विद्यापीठाच्या शिक्षकांना ७ वा वेतन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून ११ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्यानंतर राज्यात जालना जिल्यात सर्वाधिक मोठे असे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कृषी विद्यापाठाच्या अध्यापकांना ७ वा वेतन आयोगासह संग्रहालयासाठी शासन जमिन मोफत देण्याचा निर्णय आजच्या महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

अखेर राज्य सरकारकडून निर्बंधात शिथिलताःजाणून घ्या कोणत्या सवलती दिल्या मात्र त्या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य सरकारने शेवटी नागरीकांच्या दबावापुढे नमत MissionBeginAgain अंतर्गत निर्बंधात शिथिलता देत असल्याचे जाहिर केले असून आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देत रविवारी मात्र संपूर्ण शहर बंद ठेण्याचे सुधारीत नियम आज राज्य सरकारकडून संध्याकाळी जारी करण्यात आले. मात्र कोरोनाची संख्या सातत्याने वाढत असलेल्या ११ …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा नवा शासकिय निर्णय वाचलात का ? मग जाणून घ्या राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कालावधीची मुदत पूर्ण झालेल्या शासकिय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा कालावधी ३१ जुलै ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ पर्यत वाढविण्यात आला आहे. तर मंत्री, आमदाराच्या शिफारसीनुसार बदल्यांसाठी २० दिवसांचा कालावधी वाढत कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून राज्य सरकारने यासंबधीचा सुधारीत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यापूर्वी …

Read More »

पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा

मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …

Read More »

अजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल? मुख्यमंत्र्यांबद्दल 'अरे - तुरे' चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांनी स्वागताला हजर राहीले नाही म्हणून एका अधिकाऱ्याला फैलावर घेतल्याची चित्रफित व्हायरल झाली. त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावत मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांना बघायला आलात की नुकसान किती झाले बघायला आलात …

Read More »

महानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय- यासह आणखी महत्वाचे निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून गेल्याने तर्क –वितर्कांना उधाण

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक अर्धवट सोडून थेट ब्रीच कॅण्डीत दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येत असून त्यानंतर जयंत पाटील यांना अॅडमिट करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील …

Read More »

अजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : विषेश प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ४ मे २०२१ आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देत ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार …

Read More »