मुंबई: प्रतिनिधी मध्यरात्रीपासून सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गाने चांगलाच आपले आक्राळविक्राळ रूप दाखविले असून भांडूप, विक्रोळी, चेंबूर आदी ठिकाणी दरड, भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जण मृत्यूमुखी पडल्याची तर ४ जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच चांदीवली, पवई येथेही दरड कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. तर वसई-विरार भागात …
Read More »शरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही फलोत्पादनाच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार-
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादन वाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याचं ब्रॅन्डिंग करणे, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे आदी, …
Read More »राज्य सरकारच्या सर्व महामंडळे, प्राधिकरणांना या महिन्यापासून ७ वेतन आयोग लागू १ जुलै २०२१ पासून मिळणार सुधारीत वेतनश्रेणी मिळणार
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारची अंगीकृत सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेली सर्व महामंडळे, प्राधिकरातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लवकरच लागू करण्यात येणार असून त्यासाठी निकष ठरविण्याच्या कामाला आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर हे निकष तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १ जुलै २०२१ पासून त्याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. …
Read More »राज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे मुळे अत्यावश्यक असेल तरच बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र आता त्यात थोडीशी शिथिलता आणत फक्त १५ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली करण्यास राज्य सरकारने सर्व विभागांना परवानगी दिली असून ज्यांचा कालावधी विहित कालावधी पेक्षा जास्त झाला आहे अशांनाच प्राधान्य देण्याची सूचना …
Read More »मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …
Read More »बेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे रखडलेल्या प्रत्येक विभागातील भर्ती प्रक्रियेला हळुहळू सुरुवात होत असून सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली. त्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे …
Read More »बेरोजगारांसाठी खुषखबर! १५ हजार ५११ रिक्त पदे एमपीएससी मार्फत भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विविध विभागांमध्ये १५ हजार ५११ अ, ब, क वर्गातील जागा रिक्त असून या सर्व जागा एमपीएससी आयोगाच्या मार्फत लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत करत एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यात आल्यामुळे उमेदवारांच्या जास्तीची नोकरी सेवा करता …
Read More »मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सवाल, ठराव केला तर तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या? ओबीसीप्रश्नावरून झालेल्या गोंधळानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरियल डेटा मागण्याचा ठराव आम्ही केला. पण तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या ? असा सवाल करत जी माहिती अधिकृतपणे राज्य सरकारकडे नाही ती माहिती तुमच्याकडे कशी आली असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना …
Read More »एमपीएससी सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार: लोणकर कुटुंबियांना मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. …
Read More »ठाकरे सरकार दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ही ७ विधेयके मांडणार प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी
मुंबई: प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या ५ जुलै ते ६ जुलै २०२१ असे दोन दिवस सुरू राहणार असून या दोन दिवसात ५ विधेयके नव्याने या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर २ प्रलिंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या विधेयकांची यादी (1) कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya