मुंबईः विशेष प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या …
Read More »आता आमदारांच्या वाहन कर्जावरील व्याज सरकार भरणार अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या खाजगी वाहनावरील ड्रायव्हरच्या वेतनात वाढ करत त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदारांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपयांपर्यंतचा निधी वाढविण्यात आला असून त्यावरील व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी वरील …
Read More »अर्थमंत्री पवारांकडून फक्त राजकियच उत्तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून प्रश्नांचा भडीमार
मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. या मतांची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या चर्चेवरील उत्तरात फक्त राजकिय मुद्यांचीच उत्तरे असल्याची टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत पवार यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग …
Read More »चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर …
Read More »करोना आजारामुळे अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांची विधानसभेत माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आदी भागात करोना व्हायरसने प्रभावित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसेच या आजाराची लागण विधिमंडळाच्या सदस्यांना होवू नये याकरीता विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या शनिवारी संपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी …
Read More »इटलीत मुंबईसह कोल्हापूर, सांगलीतील ४६ जण अडकले परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून परत आणण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी करोना व्हायरसमुळे इटलीतील रोम येथे १०२ भारतीय अडकले असून यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील ४४ तर मुंबईतील २ दोघांचा समावेश आहे. या नागरीकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय पथक पाठवून परत आणावी अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधानसभेत …
Read More »मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा
मुंबईः विशेष प्रतिनिधी १९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा …
Read More »अर्थसंकल्प प्रादेशिक असमतोलाचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची अर्थसंकल्पावर टीका
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला नियम २९३ अन्वये सुरवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, …
Read More »हवेली-वाघोलीची स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे महानगरातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याऐवजी वाघोली-हवेली तालुक्याची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार असून याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. हवेली तालुक्यातील वाघोली येथे सातत्याने वाहतूक कोंडी, अपुरा …
Read More »अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …
Read More »
Marathi e-Batmya