राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च ला विधिमंडळात होणार सादर; अधिवेशन गाजणार राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी नवे धोरण राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा
खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा
भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …
Read More »धनंजय मुंडे यांची माहिती, मला बेल पल्सी आजाराचे निदान वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिली माहिती
मागील काही महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबधावरून आणि कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सुरेश धस आणि धनंजय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलीय
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी …
Read More »राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकोटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाची शिक्षा फसवणूकप्रकरणी दोन्ही भावांना नाशिकच्या देवळाली न्यायालायने शिक्षा सुणावली
लाडकी बहिण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. तसेच राज्य सरकारच्या दोन पैकी एका योजनेचा लाभ घेता येईल असे जाहिर करत, सध्या भिखारीही एक रूपया घेत नाही परंतु आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना …
Read More »किल्ले शिवनेरी शिवजन्मोत्सव सोहळाः मुख्यमंत्री म्हणाले, गड किल्ले मंदिरापेक्षाही मोठे राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करणार
सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष …
Read More »राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या …
Read More »
Marathi e-Batmya