Tag Archives: bjp

नाना पटोले यांची टीका, आंदोलकांना नजरकैद.. भाजपा सरकार मोगलाईपेक्षा वाईट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी टोचले मोदी यांचे कान, बेटी बचाव नव्हे तर… महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मोदींना निशाणा

महिलांना संरक्षणाची नाही तर, त्यांना भयमुक्त वातावरण हवे आहे. आपल्या महिलांवर होणारा कोणताही अन्याय असह्य, वेदनादायी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आम्हाला ‘बेटी वाचवा’ ची गरज नाही तर ‘बेटीला समान हक्क मिळवून देण्याची’ गरज असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. संपूर्ण …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाने दिली बृजभूषण सिंगला आठवड्याची मुदत गुन्हा रद्दबातल करण्यासंदर्भात लेखी म्हणणे मांडा

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या गुन्हा अर्थात एफआयआर रद्दबातल ठरविण्यासंदर्भात म्हणणे सादर करण्यास आठवठाभराची मुदत दिली. मात्र आठवडाभराची मुदत देतना बृजभूषण सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले. …

Read More »

‘लाडकी बहीण’ विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची याचिका भाजपाची टीका काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड झाल्याचा केशव उपाध्ये यांची टीका

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या

तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

नितीशकुमार-भाजपाच्या राजवटीत अशीही शिक्षा तेजस्वी यादव कडून व्हिडीओ ट्विट तरूणाच्या गुदद्वारात मिर्ची फूड टाकतानाचा भयावह व्हिडिओ

बिहारमधील अररियामध्ये एका व्यक्तीला दोरीने बांधून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर भरण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ, आता व्हायरल होत असून, त्या व्यक्तीचे हात पाठीमागे बांधलेले दिसत आहेत. त्याची अर्धी चड्डी काढलेली आहे आणि गुडघ्यापर्यंत खाली ओढण्यात आली आहे, तर अन्य एका साथीदाने संबधित तरूणाचे हात पकडून खाली वाकवल्याचे दिसून …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची

‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत …

Read More »