Tag Archives: bjp

शेतकरी सेनेचे (उबाठा ) प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

शेतकरी सेनेचे (उबाठा) प्रदेश सरचिटणीस तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी आदी उपस्थित होते. …

Read More »

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापनदिनी काँग्रेसच्या राज्यभर पदयात्रा व जाहीर सभा LPG गॅसच्या किंमतीतून मोदी सरकारने जनतेला लुटल्याचा पर्दाफाशही करणार

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ५० टक्के सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज संसदेत महिलांना आरक्षण दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा

देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा ५० टक्के होऊन वाढवून ६५ टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु तसे केंद्रातलं भाजपा सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्र सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला …

Read More »

८५ टक्के बहुजनांना ५० टक्के आणि १५ टक्क्यांना ५० टक्के आरक्षण हा कुठला न्याय ? इतर राज्यात ५० टक्यांची मर्यादा हटवली मग मराठा आरक्षणासाठीच अडचण का ? - अतुल लोंढे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे …

Read More »

लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …

Read More »

चार महिन्यात एकही बैठक झाली नाही आता एक महिन्यात काय होणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज होऊन आज तीन दिवस झाल्यानंतर गाजावाजा करत सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची आज बैठक बोलावली. या बैठकीतून काय निष्पन्न झालं तर एक समिती अभ्यास करून एक महिन्यात अहवाल देणार असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करीत केला आहे. आंदोलनात जखमी झालेल्यांची सरकारने माफी मागून शांततमाय मार्गाने …

Read More »

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ….आरक्षणाचा जीआर घेऊन या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शिष्टमंडळ जाणार जरांगे पाटील यांच्या भेटीला

मराठा आरक्षणाचा जीआर घेवून या चर्चेची दारं खुली केलीत म्हणून तुम्ही मागचे पाढे वाचू नका असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करतात राज्यातील तिघाडी सरकारकडून मराठा आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय …

Read More »

मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी

मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे …

Read More »

वातावरण तापले दोन्ही उपमुख्यमंत्री गायबः मुख्यमंत्री म्हणाले,… आरक्षण देणार सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार

मागील पाच-सहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी जालन्यातील अंबड तालुक्यातील गावी आंदोलन सुरु आहे. त्यातच पोलिसांनी या आंदोलकांवर दोन दिवसाखाली लाठीचार्ज करत वातावरण आणखीनच बिघडवले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनुक्रमे …

Read More »