Tag Archives: bjp

नाना पटोले यांची खंत, ‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने…. बोट कापण्याचा…. सत्ताधारी पक्षाची दादागिरी जनतेच्या जीवावर उठली

जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान …

Read More »

आधी महाराष्ट्रात कॅसिनो कायद्यावरून मनसेच्याबाजूने, तर आता चक्क रद्दच गरज सरो आणि वैद्य मरो, भाजपाची खेळी

राज्यात ऑनलाईन गेमवरील जीएसटी आणि ऑनलाईन जुगारावरून राज्यातील सामाजिक वातावरण चांगलेच तापलेले असताना मनसेकडून राज्यात गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो कायदा तयार करून लागू करण्याची मागणी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. त्यावेळची राजकिय गरज म्हणून भाजपाचे निष्ठावंत नेत्यांकडून सातत्याने या कायद्याची पाठराखणही करण्यात आली. …

Read More »

अजित पवार यांच्य़ा भाजपासोबत जाण्याचा पहिला फायदाः राष्ट्रवादीच्या सत्ताकेंद्रांना अभय राज्य सरकारचा तो सहकारी संस्थामधील सभासदांबाबतचा अध्यादेश मागे

राज्यात सरकार पदी कोणतेही भले भाजपाचे सरकार येवो किंवा अन्य कोणाचे येवो, पण महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि सहकारी पतपेढींवर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर देशातील सहकारी संस्थांवर काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कोणाचेही येवो, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय सत्ता केंद्रांना हात लावण्याचे धाडस भाजपाला होत नव्हते. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता केंद्रांना …

Read More »

नाना पटोले यांची टोला, गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडण्यापेक्षा पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे तलाठी परिक्षा पेपर फुटीमागील सर्वांचा छडा लावा...

नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपाप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भऱती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परिक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने …

Read More »

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) मधून आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, …आता माघार नाही ज्यांच्याकडून शिकला त्यांच्याबद्दल योग्य भावना ठेवा नाहीतर जनता योग्य जागा दाखवेल अजित पवार गटाला यांना टोला

आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, विवेक देबरॉय व रंजन गोगोईंच्या विधानांशी नरेंद्र मोदी सहमत आहेत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज विचारांचे म्हणून अपमान करणाऱ्यांचा राजीमाना घ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा २० ऑगस्टपासून घर चलो पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत 'घर चलो' अभियानात भाग घेणार

राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार असून पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघात ‘घर चलो’ अभियानात सहभागी होणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघापासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा आरंभ होणार असून या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात ३ कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती पोहचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी… शरद पवारांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर

ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजपा देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात असा पलटवार …

Read More »