Tag Archives: bjp

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह यांनी सांगितले अपमान सहन कर पण… पोहरा देवीची खोटी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली

उद्धव ठाकरेंनी नुकताच विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात करताना पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितलं की, पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवलं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असं म्हणत २०१९ …

Read More »

अंबादास दानवे यांची भन्नाट मागणी, ‘अर्थ’ शिंदेंना द्या! पवारांना `मुख्य` करा रखडलेल्या खाते वाटपावर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपाला सल्ला

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच असाव्या यासाठी अर्थ खात्यावरून चाललेला गोंधळ पाहता अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थखाते द्या आणि हा तिढा सोडवा, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपातील मोठ्या पक्षप्रवेशासाठी योजना तयार भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय २४ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

…राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांनी केली मागणी राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती, जनता उपाशी सरकार मात्र तुपाशी

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा

शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप होतात, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. मात्र अद्यापही सत्तेत आलेल्या नव्या सहकाऱ्यांचा खातेवाटप झालेला नाही. त्यामुळे नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही असे दिसते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अद्यापही राज्याचा प्रशासकीय कारभार सुरळीतपणे सुरू …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड… मणिपूर, ब्रिजभूषण शरण सिंह व अदानीवरील मौन देशासाठी घातक :- बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात …

Read More »

दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …

Read More »

भुजबळांपाठोपाठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही राष्ट्रवादीबाबत प्रश्नचिन्ह भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाण्यास तयार होती

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंडखोरी केली. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार अशा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार…तर ईट का जबाब पत्थर से! भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘ईट का जबाव पत्थर से’ देणार असल्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी त्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र; कमरेचा, गळ्याचा पट्टा….हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लोकांच्या दारी जाण्यापेक्षा घरी जा

‘भाजपावाले आणि मिंधे माझ्या ऑपरेशनवरून चेष्टा करतात. कमरेचा, गळ्याचा पट्टा सुटला म्हणतात. इतक्या खालच्या पातळीवर जाता. मी जे भोगलंय ते त्यांना भोगावं लागू नये ही माझी प्रार्थना आहे. कोणाच्या तब्येतीवरून, कोणाच्या कुटुंबावर बोलता. यामुळे माझे म्हणणं आहे की हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला कलंकच असल्याचा पुर्नरूच्चार करत शिवसेना (ठाकरे …

Read More »