शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून आज मांटूंगा येथील षण्मुखानंद हॉल मध्ये शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज भाजपासह शिंदे गटाला खुले आव्हान देत म्हणाले, निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या नारायणशी मिळती- जुळती वाक्ये शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो या मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावरून अंधारेंची टोलेबाजी
नुकतेच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळीत शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना …
Read More »अबू आझमी म्हणाले, …मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही त्याच मार्गावर महापुरूष आणि राजे महाराज्यांना धार्मिक ठरविण्यावरून केला आरोप
आज पुण्यात कथित हिंदूत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक नव्हे तर धर्मवीर होते असे जाहिर करण्यात आले. यावेळी या संघटनांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर टीकाही करण्यात आली. या मोर्चाबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारमधील लोकं हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ …
Read More »नाना पटोंलेनी केले भाकित, व्हॅलेंनटाईनच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार १४ फेब्रुवारीला न्यायालयात १६ आमदार अपात्र ठरणार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची कायदेशीर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरे गटाने या प्रकरणाची ५ सदस्यीय खंडपीठाऐवजी ७ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यांचे घटनापीठ पुढील सुनावणी घेणार की सात सदस्यीय घटनापीठाकडे याचिका वर्ग करणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली …
Read More »शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे
भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साखरेचा गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात, मी त्यांचे मार्गदर्शन घेत असतो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले, साखरेचा राजकिय गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात आले. त्यामुळेच अनेक नेत्यांच्या तोंडी त्यांचे नाव असते. याशिवाय त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो अशी कबुली दिली. …
Read More »शिंदे गटाचे वकील म्हणाले, शिंदेंना प्रतिनिधी सभेतील ९० सदस्यांचा पाठिंबा प्रतिनिधी सभेची बैठक घेण्याचा अधिकार शिंदेंनाही
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात आपलाच गट हा खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर या महिन्यातील तिसऱ्या सुनावणी वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कशाच्या आधारावर झाला याविषयी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, या सहा ठिकाणी कामगारांच्या रुग्णालयांसाठी जमीन उपलब्ध करून द्या केंद्रीय पर्यावरण, वने, कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून आढावा
महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी …
Read More »मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब त्यांची देणी तातडीने देण्याची खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी
मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद …
Read More »अतुल लोंढेचा आरोप, दावोसमध्ये करार केलेल्या कंपन्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्या दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …
Read More »
Marathi e-Batmya