राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ अन्य तीन महत्वाचे निर्णय गुरे-ढोरे रस्त्यावर आणल्यास दंड, गोरेगांवातील जमिन हिंदूस्थान लिव्हरला, निराधार योजनेची जबाबदारी तपण
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण पाच निर्णय घेण्यात आले. यापैकी तीन निर्णय राज्यातील जनतेसाठी महत्वाचे आहेत. यापैकी पहिला निर्णय हा ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्ग, एक्सप्रेस-वे वर जर गुरे-ढोरे आणली तर त्या गुराख्याला यापूर्वी कैदेची शिक्षा करण्यात येत होती. मात्र आता कैदेची शिक्षा रद्दबातल करत त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर निराधार …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना २०१६ पासून वाढीव वेतन मिळणार राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे २४० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी सेवेत असलेल्या …
Read More »समर्थकांची वर्णी लावण्यासाठी महानगरपालिकांमधील कॉप्ट नगरसेवकांच्या संख्येत वाढ पालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये निवडणूकीत पराभूत झालेल्या किंवा निवडूण येवू न शकणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मागील दाराने नगरसेवक बनविण्यासाठी कॉफ्ट किंवा नामनिर्देशित पध्दतीचा कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. मात्र यापूर्वी फक्त पाच सदस्यांनाच नामनिर्देशित करण्यात येत होते. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संख्येत वाढ करत नामनिर्देशित सदस्यांची …
Read More »आता सर्व शासकिय पत्रांवर बोधचिन्हाबरोबर राहणार “जनहिताय सर्वदा” घोषवाक्य घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे …
Read More »ठाकरे विरूध्द शिंदे, संघर्षावरील सुनावणी आता व्हेलॅनटाईन डे च्या दिवशी ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उभी फूट पाडत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष आमदार सोबत गेले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणी पोटी उध्दव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव …
Read More »बीडीडी चाळकऱ्यांना मिळणार आता मासिक भाडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्या
वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. मात्र या आढावा बैठकीत बीडीडीतील रहिवाशांना मासिक भाडे देण्याचा निर्णय घेत चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या- मुख्यमंत्री
जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती
बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला साताऱ्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा आढावा पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा
कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश …
Read More »
Marathi e-Batmya