Tag Archives: chief minister

संभाजी राजे यांचा इशारा, तर उठाव होणारच…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा केले. त्यातच शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केल्याने संभाजी राजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यांरींना काढून टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली नसल्यान अद्याप त्यांनी केलेल्या काही …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांना कामाख्या देवीने बोलावलं पण आम्हाला नाही कधी बोलावलं…

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही आक्षेपार्ह विधान केले. या विधानावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने जोरदार टीका केली. तरीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपालांबद्दल कोणतीच कारवाई केली नाही. नेमक्याच परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी गुवाहाटीचा दौरा केला. या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे गटाचे …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल, महाराष्ट्राचे देव संपले का?

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेकडून बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याचा चांगलाच समाचार घेत म्हणाले, मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, ज्याला स्वत:च भविष्य माहित नाही तो आपलं भविष्य ठरविणार

आपला नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करत म्हणाले की, काल परवा ते स्वत:च भविष्य बघायला हात दाखवायला गेले. आज काय तर म्हणे गुवाहाटीला नवस …

Read More »

काँग्रेसचा आरोप, जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री शिंदे व सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका प्रदेश …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार

राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे घोषणा, सातारा जिल्ह्यात ५०० एकरावर कृषी उद्योग

महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक …

Read More »

ज्योतिषाकडे हात दाखविल्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, ज्याला दाखवायचाय होता त्याला…

काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द करत शिर्डी दौऱ्यावर गेले. तसेच साईबाब मंदीरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एका ज्योतिषाकडे जात आपला हात दाखविल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला. त्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका होत असून राज्यानेच केलेल्या अंधश्रध्दा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरेंची टीका, सध्याची राज्याची अवस्था म्हणजे कोणीही यावे आणि…

वृद्धाश्रमात ज्यांना जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून पाठवायचे हेच अत्यंत चुकीचे आहे. अशा राज्यपालांना हटवा. अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तेथे पाठवा पण हे सॅम्पल आमच्याकडे नको अशा खोचक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टिका केली. तसेच सध्या राज्याची अवस्था म्हणजे …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ?

महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमा वाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्वाचे प्रकल्प भाजपा शासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले …

Read More »