मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कांदिवली येथी शताब्दी रूग्णालयाच्या औषध खरेदी चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या औषध प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असे सांगत मुंबईत ५५०० आशा वर्करची भरती करणार …
Read More »न्यायालयाचा सवाल तर जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंवर आरोप नागपूरातील जमिन वाटपप्रकरणावरून एकनाथ शिंदे संशयाच्या भोवऱ्यात
नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टची (NIT) जमीन १६ जणांना भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश तत्कालिन नगरविकास मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भूखंडाचे वाटप झालेच कसे? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही …
Read More »विधान भवनातील शिवसेना कार्यालयातून शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढले नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांची दांडगाई
शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद जरी सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जरी अद्याप प्रलंबित असला तरी नागपूरातील गारठलेल्या वातावरणात शिवसेनेतील शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याने थंडीच्या वातावरणातही विधानभवनातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचे झाले असेल की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने जरा जास्तच …
Read More »अजित पवारांनी आत्राम यांचा मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले आश्वासन नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सीमावाद आणि कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या विरोधात सुर केलेल्या कारवाईवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारम्याची धमकी देण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन …
Read More »अजित पवार यांचा इशारा, कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही विधानसभेत अजित पवारांचा आक्रमक पवित्रा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »विरोधकांच्या हल्ल्यावरून मुख्यमंत्री शिंदे संतापून म्हणाले, ए गपा बसा… अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरु असल्याने त्यांनी गप्प बसा असं सांगत फटकारलं. महत्त्वाचं म्हणजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटवर खात्यावरुन ट्वीट …
Read More »अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ठरलेले कोण मोडतोय… कर्नाटक सरकारच्या आगळीकीनंतर अजित पवारांचा सवाल
कर्नाटक विधानसभेचं बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया …
Read More »हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार मांडणार ही २३ विधेयके प्रस्तावित विधेयके :- २३ (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त - १२,मंत्रीमंडळ मान्यता सापेक्ष-११) पटलावरती ठेवावयाचे अध्यादेश -५
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर रोजीपासून सुरु होत असून या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त अशी एकूण २३ विधेयके मांडण्यात येणार आहे. तर ५ अध्यादेश विधिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच यातील अनेक विधेयके मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्यात येणार असल्याचे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून स्पष्ट …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर, हे खोके सरकार नाही तर… चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला दावा
अजित दादा म्हणाले हे खोके सरकार आहे हे स्थगिती सरकार आहे हे घटनाबाह्य सरकार आहे एकच सांगू इच्छितो हे सरकार पूर्णपणे या देशाची जी घटना आहे बाबासाहेबांनी दिली त्याप्रमाणे कायदेशीर बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन झालेल्या लोकांच्या जनमताच आदर राखून आणि सभागृहामध्ये मेजॉरिटी सिद्ध करून बहुमत सिद्ध करून हे सरकार स्थापन …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार रत्नागिरीच्या जिल्हा आढावा बैठकीत केली घोषणा
कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा …
Read More »
Marathi e-Batmya