पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये घालविलेले स्व.वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे,स्व वसंतदादा पाटील यांचे पुत्र मदन पाटील हे काँग्रेसमधूनच आमदार आणि खासदार पदी निवडूण आले. तर काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही राहिले. …
Read More »राज ठाकरे यांचा सरकारला इशारा, हिंदी सक्ती हा महाराष्ट्रद्रोहच हिंदी भाषा कशी शिकवता ते बघतोच!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत त्रिसुत्री भाषा धोरणानुसार हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आली. मात्र त्यास सर्वच विरोधी पक्षियांनी विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने हिंदी भाषेला भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. मात्र त्यास २० विद्यार्थ्यांची अट कायम ठेवली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्रिभाषा असताना द्विभाषा सुत्र स्विकारू शकत नाही आता पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही पण अन्य भाषेचा पर्याय
राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिली ते पाचवीपर्यंत मराठी-इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थी आता तिसरी भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा निवडू शकतात. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल. विभागाच्या …
Read More »कर्नाटक सरकारकडूनही कामगार कायद्यात बदलः कामाचे तास १० तास आंध्र प्रदेशनंतर आता कर्नाटक राज्याकडूनही कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी
कर्नाटक सरकारने कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे दैनंदिन कामकाजाचे तास सध्याच्या नऊ तासांवरून १० पर्यंत वाढवले जातील आणि ओव्हरटाइम तासांना परवानगी दिली जाईल. कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ हा राज्यातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे तास आणि कामगार परिस्थिती …
Read More »धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ
धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णयांना मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे असे ९ ते १० निर्णय घेण्यात आले. यात आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळाणाऱ्या मानधनात दुपट्टीने वाढ केली आहे. तर आदिवासी इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिन, मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर शेतकऱ्यांसाठी नव्या महाॲग्री-एआय धोरणास मंजूरी
राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रॉ प्रताप सरनाईक …
Read More »पुण्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला, दोघांचा मृत्यू काही लोक वाहून गेले, मृत्यू पावलेल्यांना पाच लाखांची मदत
मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेली पावसाची संततधार आजही कायम रविवारीही कायम होती. रविवारच्या या दुपारच्या मुसळधार पावसात पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल अर्थात कुंडमळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूल कोसळून इंद्रायणी नदीत पडला आणि …
Read More »केदारनाथ मंदिराजवळ हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू गुजरातमधील विमान अपघातानंतर आता उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात
रविवारी (१५ जून २०२५) पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये सर्व सात जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये सुमारे ४० दिवसांत हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण करत होते. मात्र हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बद्री-केदार मंदिर समितीचे प्रमुख हेमंत द्विवेदी यांनी …
Read More »
Marathi e-Batmya