Tag Archives: chief minister

अतुल लोंढे यांची मागणी, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा

पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून …

Read More »

हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे ‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश

राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘ जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा हवेतच सर्वसामान्यांची वीज बिलाच्या भुर्दंडातून सुटका नाहीच

भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका बारच निघाला असून सर्वसामान्य जनतेला मात्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना, शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती संकेतस्थळांवर उपलब्ध सर्व विभागांनी उपलब्ध करून द्यावी

राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास मंजूरी

अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याबरोबरच वडसा-देसाईगंज- गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधी, बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब आणि टाकळगांव हिंगणी, निमगांव, येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास मंजूरी आणि यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ …

Read More »

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठी मार्वल शासकीय कंपनीसाठी समिती स्थापन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर व्हावा यासाठी मार्वल या शासकीय कंपनीच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्य पोलीस दलातील कृत्रिम बृद्धीमत्तेच्या वापरासाठी महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार

मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार …

Read More »

वक्फ विधेयकावरील चर्चेच्या कालावधीवरून विरोधकांचा बीसीएतून सभात्याग टीडीपीकडून तीन स्वतंत्र विधेयके तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का? महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवायचा सरकारचा प्रयत्नः चोर सोडून संन्याशाला फाशी हे महायुती सरकारचे धोरण

काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृह खात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना …

Read More »