Tag Archives: cm uddhav thackeray

कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन

अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना  मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने  पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत  ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची …

Read More »

सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईःखास बातमीदार कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर …

Read More »

कोरोना इम्पॅक्टः ते आदेश ३१ मार्चपर्यंत नव्हे तर पुढेही राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पुणेः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळांच्या परिक्षा, महाविद्यालय, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि खाजगी आस्थापनाच्या संदर्भात काढलेले आदेश हे ३१ मार्च २०२० पर्यंतच लागू राहणार नाहीत, तर राज्य सरकारकडून पुढील आदेश निघेपर्यंत राज्याला लागू राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणे …

Read More »

आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …

Read More »

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसार होणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करत नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे सांगत दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच असून त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सीबीएसई आणि इतर …

Read More »

कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरण कक्षासाठी आदर्श बिल्डींग? रूग्णालयांच्या जागा कमी पडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या रूग्णांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यानाही या आजाराची लागण होत असल्याने विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी खाजगी हॉटेलची मदत घेण्यात येत आहे. मात्र सरकारच्या जमीनीवर उभ्या असलेल्या ३१ मजली आदर्श इमारतीचा वापर सरकारकडून का करण्यात येत …

Read More »

लोकल, बस, बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद शासकिय कार्यालयातील २५ टक्केवर सुरु राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी संपूर्ण जगावर लढण्याऐवजी थांबण्याची वेळ आली आहे. सततची वाढती गर्दी ओसरण्यास सुरुवात झालेली असली तरी ही गर्दी पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह राज्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील लोकल सेवा, बसेस आणि बँका वगळता गर्दी होण्यास कारण ठरणारी सर्व …

Read More »

शासकिय नियमाचा गृहनिर्माण मंत्र्यांकडूनच भंग बैठका टाळण्याचे आदेश असतानाही बंगल्यावर अधिकारी विकासकांसोबत बैठका

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्यावर नियंत्रण आणि मंत्रालयासह शासकिय कार्यालयांमध्ये बैठकांचे आयोजन करू नये असे आदेश नुकतेच काढले. मात्र या आदेशालाच केराची टोपली दाखवित गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या बंगल्यावर विकासक, अधिकाऱ्यांचा दिवसभर बैठकांचा धडाका लावल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना व्हायरसचा …

Read More »

कोरोनाच्या लढाईत वैद्यकिय शिक्षण मंत्र्याची पहिल्यांदा हजेरी १३३० बेडचे 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मदतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच धावल्याचे चित्र दिसत असताना राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मात्र कोठेच दिसत नव्हते. अखेर चार-पाच दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्याचे दिसून येत …

Read More »

सरकार स्वतःहून निर्णय घेवू शकते, मात्र मुंबईकरांनाे घराबाहेर पडणे टाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणात गर्दी ओसरली आहे. त्यापेक्षा आणखी कमी झाली पाहिजे मी म्हणतो की बंदच झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडत लोकल, बसेस आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेवू शकते मात्र नागरिकांनी स्वतःहूनच …

Read More »