Tag Archives: congress

भाजपाची काँग्रेसवर कुरघोडी, २५ जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळणार केंद्र सरकारकडून गॅझेटही जारी केले

केंद्र सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीतील अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण होईल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी १२ जुलै रोजी सांगितले. एक्स X वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये, अमित शाह म्हणाले की, दमनशाही सरकारच्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, थकित वीज बील माफ करा शेतकऱ्यांसाठी मदतीचा आव हे महायुतीचे फेक नॅरेटीव्ह

केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी अनिल अंबानींच्या कर्जमाफीसाठी १७०० कोटी आणि ‘लाडकी बहिण’ला मात्र फक्त १५०० रुपये!

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा …

Read More »

शंभुराज देसाई यांचा आरोप, शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक अनुपस्थितीत

मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. या बैठकीला अनुपस्थित राहून विरोधी पक्षांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा, सामाजिक तेढ निर्माण करण्याला अधिक खतपाणी घालायचे असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केला. सरकारला असहकार्य करण्याची आडमुठी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. मराठा ओबीसीच्या आरक्षणाचा वाद …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, … मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही? आरक्षण प्रश्नावरील स्वतःचे पाप लपवण्यासाठी महायुती सरकारकडून राजकारण

सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठा आरक्षण प्रश्नावर गुलाल उधळला तो कशासाठी, असा सवाल उपस्थित करून सरकारचा एक मंत्री ओबीसी आंदोलनात जाऊन जाहीरपणे विरोधी भूमिका घेतो. सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर …

Read More »

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब

विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत सुरळीत पार पडल्यानंतर काल रात्री राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या निर्माण झालेल्या राजकिय तिढा सोडविण्यासाठी सर्वपक्षिय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्या बैठकीकडे विरोधकांकडून पाठ दाखविण्यात आली. त्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर प्रत्यारोप करत सभागृत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यास विरोधकांकडूनही प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, विरार-अलिबाग, पुणे रिंग रोड प्रकल्प गैरव्यवहाराची चौकशी करा भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित करा

विरार-अलिबाग कॉरीडर आणि पुणे रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादनात गैरव्यवहार झाला आहे. वसई-विरार भूसंपादनात देखील गैरव्यवहार झाला आहे. या दोन्ही गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच हा गैरव्यहार करणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून त्यास तात्काळ निलंबित करावे,अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, ९४ हजार कोटी…समाजाला किती वाटा मिळणार ? भंडारा जिल्ह्यातील शिक्षक व पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरा

भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची १५०० पदे रिक्त आहेत, सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पद भरती करत नाही. शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कुठून राहणार असा प्रश्न उपस्थित करुन ही रिक्त पदे किती दिवसात भरणार याची हमी सरकारने द्यावी. साकोली, लाखणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्ग …

Read More »

जयराम रमेश यांचा सवाल, ११ व्यांदा रशिया दौऱ्यावरील पंतप्रधानांनी हे मुद्दे उपस्थित केले का? रशिया सैन्यातील भारतीय नागरिकांबाबतचा मुद्दा कधी उपस्थित करणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि अर्थंसकल्पिय अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि मध्य पूर्वेतील काही देशांना भेट देण्याकरीता परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स या ट्विटरवरून काही प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूबः अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून …

Read More »